शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

आता ‘सरसकट’च्या निकषाकडे डोळे

By admin | Updated: June 13, 2017 00:56 IST

बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा फायदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीतील १ लाख ३६ हजार ४८३ अल्प, अत्यल्प खातेदारांना होणार हे निश्चित आहे

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा फायदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीतील १ लाख ३६ हजार ४८३ अल्प, अत्यल्प खातेदारांना होणार हे निश्चित आहे. सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली असली तरी त्याचे निकष निश्चित नाहीत. जिल्ह्यात पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकरी खातेदारांची संख्या ३० हजार ३६४ इतकी असून या खात्यावरील कर्जाचा बोजा जवळपास १८२ कोटी इतका आहे. या खातेदारांचे डोळे आता कर्जमाफीच्या निकषाकडे लागले आहे. बँकेच्या अत्यल्प, अल्प आणि बहुभूधारक शेतकरी खातेदारांची एकूण संख्या १ लाख ६७ हजार ६०८ इतकी असून कर्जाचा बोजा जवळपास ६२१ कोटी १४ लाख रुपयांचा आहे.जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शासनास ३१ मार्च २०१७ रोजी पर्यंतची आकडेवारी पाठविली, त्यानुसार या कर्जमाफीचा फायदा वरील शेतकऱ्यांना होईल असे वाटते. शेतकरी संपामुळे सुकाणू समितीसोबत झालेल्या चर्चेनंतर सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात परळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारकांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी आता लगेचच होणार आहे. बीड जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या आणि त्यांच्यावरील कर्जाचा आढावा घेतला असता वरीलप्रमाणे माहिती मिळाली. हे खातेदार फक्त डीसीसीच्या अखत्यारीतील आहेत.