शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

आता औरंगाबादेतही विजेचे प्रीपेड मीटर; महावितरणकडे पहिल्या टप्प्यात अडीच हजार मीटरची केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 16:03 IST

महावितरणने पहिल्या टप्प्यात शहरात अडीच हजार प्रीपेड मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

- विजय सरवदे 

औरंगाबाद : थकबाकी वसूल करण्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबविल्यानंतरही फारसे यश येत नसल्यामुळे महावितरणने पहिल्या टप्प्यात शहरात अडीच हजार प्रीपेड मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

यासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालये, शासकीय निवासस्थाने आणि बांधकाम व्यावसायिकांना प्रीपेड मीटर सक्तीचे केले जाणार आहे. अनेकदा शासकीय निवासस्थानांमध्ये राहणारे कर्मचारी-अधिकारी विद्युत बिल न भरताच बदलीने दुसऱ्या ठिकाणी निघून जातात. त्यानंतर त्या निवासस्थानामध्ये राहण्यासाठी आलेला अधिकारी-कर्मचारी वीज बिलाची थकबाकी भरत नाही. 

सारखीच परिस्थिती शासकीय कार्यालयांचीदेखील आहे. दुसरीकडे, बांधकाम व्यावसायिक हे सुरुवातीला सदनिका बांधकामासाठी विद्युत पुरवठा घेतात. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित मीटरचे वीज बिल न भरताच सदनिका विकल्या जातात व बांधकाम व्यावसायिक निघून जातात. त्यानंतर बांधकामासाठी घेतलेल्या विद्युत पुरवठ्याचे थकीत बिल आम्ही का भरावे, असा वाद सदनिकांमध्ये राहण्यासाठी आलेले नागरिक घालतात. त्यामुळे प्रीपेड मीटरची ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरुवातीला शासकीय कार्यालये, शासकीय निवासस्थाने आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी राबविली जाणार आहे. 

यासाठी सप्टेंबरमध्ये महावितरणच्या मुख्यालयाकडे औरंगाबाद परिमंडळाने अडीच हजार प्रीपेड मीटरची मागणी केली आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात सामान्य ग्राहकांसाठी प्रीपेड मीटरद्वारे विद्युत पुरवठा करण्याचा महावितरणचा विचार आहे. पुढील महिन्यात हे प्रीपेड मीटर प्राप्त होण्याची अपेक्षा आहे, असेही मुख्य अभियंता गणेशकर यांनी सांगितले.

प्रीपेड मीटरची कार्यप्रणाली कशी असेल ?- मोबाईल प्रीपेड कार्डप्रमाणे प्रीपेड मीटरची कार्यप्रणाली असेल. ग्राहकाला जेवढ्या युनिटची वीज हवी आहे, त्यांनी अगोदर तेवढे पैसे भरावे लागतील. त्यांना तेवढ्याच रकमेचे कार्ड दिले जाईल. ते कार्ड मीटरमध्ये बसविण्याची सुविधा असणार आहे. 

- जसजसा विजेचा वापर वाढत जाईल, त्याप्रमाणात मीटरमध्ये लाईटद्वारे सूचना मिळतील. अगोदर हिरवी लाईट लागेल, त्यानंतर पैसे कमी होत गेल्यास लाल लाईटद्वारे त्यासंबंधीची पूर्वसूचना ग्राहकांना मिळेल. पूर्ण रकमेचा वीज वापर झाल्यास आपोआप विद्युत पुरवठा खंडित होईल. 

- त्यामुळे सतत लाल लाईट लागल्यास विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी ग्राहकांना महावितरणकडे पैसे भरावे लागतील. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज