शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नामांतराच्या वादात आता भाजपची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:05 IST

राजू शिंदे : ‘लव्ह औरंगाबाद’चे विमोचन पालकमंत्र्यांनी का केले? औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी ‘लव्ह औरंगाबाद’, ‘सुपर ...

राजू शिंदे : ‘लव्ह औरंगाबाद’चे विमोचन पालकमंत्र्यांनी का केले?

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी ‘लव्ह औरंगाबाद’, ‘सुपर संभाजीनगर’ ‘लव्ह खडकी’ अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा नामांतराचा वाद विकोपाला जात आहे. या वादात आता भाजपनेही जाहीरपणे उडी घेतली आहे. महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. शहरातील ‘लव्ह औरंगाबाद’ बोर्डाचे विमोचन शिवसेनेचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. त्यामुळे शिवसेना पालकमंत्र्यांना शहरात प्रवेश करण्यास रोखणार का, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

रविवारी मुंबईत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ‘संभाजीनगर’च्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सायंकाळी भाजपमधील स्थानिक नेते या मुद्द्यावर अग्रेसर झाले. शहरात नामांतराचा मुद्दा पेटलेला असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतर आम्हाला अमान्य असल्याचे चार दिवसांपूर्वी नमूद केले? होते. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपसात चिखलफेक करू नये, असे निकष तिन्ही पक्षातील नेते पाळत आहेत. मात्र खैरे यांच्याकडून हे संकेत पाळले गेले नाहीत. त्यातच सायंकाळी भाजप नेते राजू शिंदे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. जळगाव रोडवर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शहरातील पहिल्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजप नेतेही उपस्थित होते. भाजप नेत्यांनी मनपा प्रशासनाला स्पष्ट शब्दात बजावले होते की, ‘लव्ह औरंगाबाद’ हा विषय आम्हाला मान्य नाही. त्यानंतरही स्मार्ट सिटी प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी बोर्ड उभे केले. मुळात अशा पद्धतीचे वादग्रस्त बोर्ड उभारण्याची परवानगी स्मार्ट सिटीला कोणी दिली? शिवसेना या मुद्द्यावर आता राजकारण करीत आहे. शिवसेनेला औरंगाबाद ...... होते तर त्यांच्याच पालकमंत्र्यांनी अनावरण का केले, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे स्थानिक नेते पालकमंत्र्यांना शहरात येण्यापासून रोखणार आहेत का? एकीकडे विरोध दुसरीकडे आपल्याच नेत्यांसोबत मागे पुढे फिरणे ही दुटप्पी भूमिका शिवसेनेची असल्याचे त्यांनी नमूद केले.