शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

मुख्याधिकाऱ्यांना बजावली नोटीस

By admin | Updated: May 15, 2015 00:48 IST

जालना : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्यात पाच मॉडेल प्रकल्पांपैकी एक असलेल्या जालना येथील घनकचरा प्रकल्पाच्या कामातील अनियमिततेबद्दल

जालना : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्यात पाच मॉडेल प्रकल्पांपैकी एक असलेल्या जालना येथील घनकचरा प्रकल्पाच्या कामातील अनियमिततेबद्दल जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस बजावली आहे. २००९ मध्ये पुजारी हेच नगरपालिकेत मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यावेळी प्रशासकीय मान्यता न घेता जिल्हाधिकारी यांच्या परवानगीविना निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एजन्सी नियुक्त करून थेट कामाचे आदेशही देण्यात आले. एवढेच नव्हे तर नंतर यंत्रणा न आणताच संबंधित एजन्सीच्या नावे ६६ लाखांचा धनादेश देण्यात आला. या प्रकारामुळे गेल्या सहा वर्षांपासून घनकचरा प्रकल्प रखडलेला आहे. प्रशासकीय मान्यतेविनाच देयक अदा करण्यात आल्याने हे प्रकरण विभागीय आयुक्तांच्या कोर्टात गेले. मात्र तेथेही जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले.या प्रकरणात अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्याने जिल्हाधिकारी नायक यांनी मुख्याधिकारी पुजारी यांना १३ मे रोजी नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत खुलासा मागविला आहे. खुलासा समाधानकारक न आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे संकेत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी १९ एप्रिल रोजी दिले होते. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्देशानुसार शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या भुमिकेबाबत कार्यवाही व्हावी, असे नमूद केले होते. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी द्यावी, असेही म्हटले होते.४न्यायालयाच्या या निर्देशानुसार राज्य शासनाने २००३-०४ मध्ये राज्यातील पाच शहरांमध्ये घनकचरा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे ठरविले होते. या पाच शहरांमध्ये जालना शहराचा समावेश होता. तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी या प्रकल्पासाठी मंजुरी व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. प्रकल्पासाठी पर्यावरण मंडळाकडून ३ कोटींचा निधी मिळाला होता.या प्रकल्पासाठी जागा निश्चित करताना सुरूवातीला जामवाडी येथील जागेचा पर्याय निवडला गेला. मात्र तेथील स्मशानभुमीचा प्रश्न लक्षात घेता सामनगाव येथील जागा निश्चित करण्यात आली. २००५-०६ नंतर निविदा काढण्यात आली. तोपर्यंत प्रकल्पाचा खर्च वाढला. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीतूनही तरतूद करण्याचे नगरपालिकेने ठरविले. नगरपालिकेने निविदा प्रसिद्ध केली व नंतर पुणे येथील एक एजन्सीही निश्चित केली.