शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

मुख्याधिकाऱ्यांना बजावली नोटीस

By admin | Updated: May 15, 2015 00:48 IST

जालना : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्यात पाच मॉडेल प्रकल्पांपैकी एक असलेल्या जालना येथील घनकचरा प्रकल्पाच्या कामातील अनियमिततेबद्दल

जालना : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्यात पाच मॉडेल प्रकल्पांपैकी एक असलेल्या जालना येथील घनकचरा प्रकल्पाच्या कामातील अनियमिततेबद्दल जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस बजावली आहे. २००९ मध्ये पुजारी हेच नगरपालिकेत मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यावेळी प्रशासकीय मान्यता न घेता जिल्हाधिकारी यांच्या परवानगीविना निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एजन्सी नियुक्त करून थेट कामाचे आदेशही देण्यात आले. एवढेच नव्हे तर नंतर यंत्रणा न आणताच संबंधित एजन्सीच्या नावे ६६ लाखांचा धनादेश देण्यात आला. या प्रकारामुळे गेल्या सहा वर्षांपासून घनकचरा प्रकल्प रखडलेला आहे. प्रशासकीय मान्यतेविनाच देयक अदा करण्यात आल्याने हे प्रकरण विभागीय आयुक्तांच्या कोर्टात गेले. मात्र तेथेही जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा निर्णय घ्यावा, असे आदेश देण्यात आले.या प्रकरणात अनियमितता झाल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्याने जिल्हाधिकारी नायक यांनी मुख्याधिकारी पुजारी यांना १३ मे रोजी नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत खुलासा मागविला आहे. खुलासा समाधानकारक न आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. याप्रकरणी मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे संकेत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी १९ एप्रिल रोजी दिले होते. (प्रतिनिधी)सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्देशानुसार शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या भुमिकेबाबत कार्यवाही व्हावी, असे नमूद केले होते. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव व जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी द्यावी, असेही म्हटले होते.४न्यायालयाच्या या निर्देशानुसार राज्य शासनाने २००३-०४ मध्ये राज्यातील पाच शहरांमध्ये घनकचरा पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे ठरविले होते. या पाच शहरांमध्ये जालना शहराचा समावेश होता. तत्कालीन नगराध्यक्ष भास्कर अंबेकर यांनी या प्रकल्पासाठी मंजुरी व निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. प्रकल्पासाठी पर्यावरण मंडळाकडून ३ कोटींचा निधी मिळाला होता.या प्रकल्पासाठी जागा निश्चित करताना सुरूवातीला जामवाडी येथील जागेचा पर्याय निवडला गेला. मात्र तेथील स्मशानभुमीचा प्रश्न लक्षात घेता सामनगाव येथील जागा निश्चित करण्यात आली. २००५-०६ नंतर निविदा काढण्यात आली. तोपर्यंत प्रकल्पाचा खर्च वाढला. त्यामुळे वित्त आयोगाच्या निधीतूनही तरतूद करण्याचे नगरपालिकेने ठरविले. नगरपालिकेने निविदा प्रसिद्ध केली व नंतर पुणे येथील एक एजन्सीही निश्चित केली.