शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

कर वसुली न करणाऱ्या ग्रामपंचायतींना नोटिसा

By admin | Updated: November 28, 2014 01:10 IST

जालना : ५० टक्के पेक्षा कमी कर वसुली असणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात सोबतच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी सांगितले.

जालना : ५० टक्के पेक्षा कमी कर वसुली असणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात सोबतच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी सांगितले.जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून समाधान कारक कर वसूली होत नसून परिणामत: गावातील छोट-छोटे विकास कामे करण्यासही ग्रामपंचायतकडे निधी नसतो. अनेक ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेवर अवलंबून रहावे लागते. ही बाब जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच कर वसुलीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात याव्यात, असे त्यांनी आदेशित केले होते. त्यानुसार पंचायत समिती स्तरावरुन कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्या-त्या ग्रामपंचायतीने कर वसुली संदर्भात समाधानकारक खुलासा न केल्यास संबंधित ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक, सरपंचाविरुध्द नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी सांगितले.जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गावात विकास योजना व ग्रामस्थांना मूलभूत सुविधा न पुरविल्याने कर द्यायचा कसला? असा प्रश्न ग्रामस्थ करीत असतात. दरम्यान, काही ग्रामपंचायती व सरपंचांनी कर वसुलीसाठी जनजागृती सुरु केल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)४जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. टी. केंद्रे यांनी सांगितले की, गावात दिवाबत्ती, साफसफाई तसेच इतर मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी अनेक ग्रामपंचायतींना निधीची गरज असते. हा निधी ग्रामपंचायतीने घरपट्टी, पाणीपट्टी आदी कर वसूलीतून उभा करावा. ज्या ग्रामपंचायतींची वसूली ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्यात येणार आहे. दरम्यान, काही ग्रामपंचायतींनी चांगली कर वसूली केली असून काही एका दिवसात ५० हजार रुपयांचीही वसुली केल्याचे केंद्रे म्हणाले.