शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

२३ गावांतील शौचालय नसलेल्या कुटुंबांना नोटिसा

By admin | Updated: August 5, 2015 00:39 IST

बालाजी बिराजदार ,लोहारा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीकडून गावामध्ये शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना नोटीसा बजावण्यात येत असून, उघड्यावर शौचालयास गेल्यास गुडमॉर्निंग

बालाजी बिराजदार ,लोहारातालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीकडून गावामध्ये शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना नोटीसा बजावण्यात येत असून, उघड्यावर शौचालयास गेल्यास गुडमॉर्निंग पथकाकडून कारवाई झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही, असे नोटिसेत स्पष्ट करण्यात आले आहे. लोहारा तालुक्यात सध्या स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास याप्रमाणे तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जि. प. व पं. स. ने केला. ही बाब चांगली असली तरी सध्याची परिस्थिती संकल्पासाठी फारशी अनुकुल नाही. लोहारा तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाला. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिकेही वाळून जात आहेत. शेतकरी ऊस तोडून जनावरांपुढे टाकत आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. साठवण तलाव, पाझर तलाव उन्हाळ्यातच आटले आहेत. माकणी निम्न तेरणा प्रकल्पातील पाणीही आटल्यात जमा आहे. त्यामुळे तालुक्यातील ४० गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी माणसांबरोबर जनावरांचीही पायपीट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, व्यापारी यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीमध्ये जगायचे कसे? हाच प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तालुक्यातील ४५ पैकी २३ ग्रामपंचायतीकडून शौचालय अधिनियम क्रमांक २२ कलम ११५, ११६ व ११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी रस्त्यात किंवा रस्त्याजवळ उपद्रव, अस्वच्छता करणे, शौचालय बांधकाम न करणे आदी बाबींचा समावेश असलेल्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. तसेच पोलिस अधिनियमानुसार १ हजार २०० रुपये दंड केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उघड्यावर शौचास गेल्यास गुडमॉर्नींग पथकाकडून कारवाई झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्रामस्थही चांगलेच पेचात सापडले आहेत. एकीकडे प्रशासनाची नोटिसबाजी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शौचालयाचे बांधकाम करायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीचे अधिकारी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाहीत. कसल्याही परिस्थितीत शौचालयाचे बांधकाम झालेच पाहिजे, असे ठणकावून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी सुरेश शिवदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.