शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

२३ गावांतील शौचालय नसलेल्या कुटुंबांना नोटिसा

By admin | Updated: August 5, 2015 00:39 IST

बालाजी बिराजदार ,लोहारा तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीकडून गावामध्ये शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना नोटीसा बजावण्यात येत असून, उघड्यावर शौचालयास गेल्यास गुडमॉर्निंग

बालाजी बिराजदार ,लोहारातालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीपैकी २३ ग्रामपंचायतीकडून गावामध्ये शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना नोटीसा बजावण्यात येत असून, उघड्यावर शौचालयास गेल्यास गुडमॉर्निंग पथकाकडून कारवाई झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही, असे नोटिसेत स्पष्ट करण्यात आले आहे. लोहारा तालुक्यात सध्या स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास याप्रमाणे तालुका हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प जि. प. व पं. स. ने केला. ही बाब चांगली असली तरी सध्याची परिस्थिती संकल्पासाठी फारशी अनुकुल नाही. लोहारा तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाला. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, पावसाने दडी मारल्याने उगवलेली पिकेही वाळून जात आहेत. शेतकरी ऊस तोडून जनावरांपुढे टाकत आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. साठवण तलाव, पाझर तलाव उन्हाळ्यातच आटले आहेत. माकणी निम्न तेरणा प्रकल्पातील पाणीही आटल्यात जमा आहे. त्यामुळे तालुक्यातील ४० गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी माणसांबरोबर जनावरांचीही पायपीट होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी, मजूर, व्यापारी यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. अशा परिस्थितीमध्ये जगायचे कसे? हाच प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तालुक्यातील ४५ पैकी २३ ग्रामपंचायतीकडून शौचालय अधिनियम क्रमांक २२ कलम ११५, ११६ व ११७ नुसार सार्वजनिक ठिकाणी रस्त्यात किंवा रस्त्याजवळ उपद्रव, अस्वच्छता करणे, शौचालय बांधकाम न करणे आदी बाबींचा समावेश असलेल्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. तसेच पोलिस अधिनियमानुसार १ हजार २०० रुपये दंड केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उघड्यावर शौचास गेल्यास गुडमॉर्नींग पथकाकडून कारवाई झाल्यास ग्रामपंचायत जबाबदार राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ग्रामस्थही चांगलेच पेचात सापडले आहेत. एकीकडे प्रशासनाची नोटिसबाजी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शौचालयाचे बांधकाम करायचे कसे? असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीचे अधिकारी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाहीत. कसल्याही परिस्थितीत शौचालयाचे बांधकाम झालेच पाहिजे, असे ठणकावून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी सुरेश शिवदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.