शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

गृह विभागासह साखर आयुक्त व इतर प्रतिवाद्यांना खंडपीठाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:33 IST

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रस्तावित चतुर्वेदेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी २००० साली समभागाद्वारे पैसे जमा करून कारखान्याच्या नावे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली; मात्र अद्याप कारखाना सुरू केला नसून सदर जमीन स्वत:च्या कुटुंबियांच्या नावे केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

ठळक मुद्देमंत्री लोणीकर यांच्या प्रस्तावित चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याच्या जमिनीचे प्रकरण

औरंगाबाद : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रस्तावित चतुर्वेदेश्वर साखर कारखाना सुरू करण्यासाठी २००० साली समभागाद्वारे पैसे जमा करून कारखान्याच्या नावे मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली; मात्र अद्याप कारखाना सुरू केला नसून सदर जमीन स्वत:च्या कुटुंबियांच्या नावे केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.यासंदर्भात प्रशासनाच्या विविध विभागांना निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.एस. शिंदे व न्या. अरुण ढवळे यांनी मंत्री लोणीकर यांना वगळता प्रतिवादी गृहविभाग, साखर आयुक्त आणि सहआयुक्त, पुणे, विभागीय सहसंचालक (साखर), जालन्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आष्टीचे पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.मंत्री लोणीकरांनी २००० साली जालना जिल्ह्यात चतुर्वेदेश्वर साखर कारखाना म. लोणी खुर्द (ता. परतूर) या नावाने सुरू करण्यासाठी समभागाद्वारे (शेअर्स) पैसे जमा के ले. शेअर्सच्या पैशातून लोणीकर मुख्य प्रवर्तक असलेल्या चतुर्वेदेश्वर कारखान्याच्या नावे जमिनी घेतल्या; परंतु कारखाना मात्र अद्यापपर्यंत अस्तित्वात आला नाही. जमिनी घेतल्यानंतर त्यांची नोंद कारखान्याच्या नावे फेरफार व सातबारावर घेण्यात आली. त्यानंतर २०१७ मध्ये सदरील जमिनी लोणीकर व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे करण्यास सुरुवात झाली. सदर माहिती याचिकाकर्ते बळीराम कडपे यांनी माहिती अधिकारात मिळविली. कारखान्यासंबंधी सहसंचालक औरंगाबाद (साखर), साखर संचालक पुणे यांच्याकडे माहिती मागविली असता चतुर्वेदेश्वर नावाने कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनानेही कारखान्याच्या नावावर खाजगी अथवा सहकारी तत्त्वावर परवानगी दिली नसल्याचे समोर आले आहे. याविरुद्ध जालना पोलीस अधीक्षकांना लोणीकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी दिलेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बळीराम कडपे यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. याचिकेत लोणीकरांसह, राज्य शासन, गृह विभाग, साखर आयुक्त पुणे, सहकार आयुक्त पुणे, विभागीय सहसंचालक (साखर) औरंगाबाद , जिल्हा पोलीस अधीक्षक जालना, पोलीस निरीक्षक आष्टी आदींना प्रतिवादी करण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून मंत्री लोणीकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. याचिकेची पुढील सुनावणी १० जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे काम पाहत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCourtन्यायालयBabanrao Looneykarबबनराव लोणीकर