शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

दुभाजक नव्हे, ही तर टेकडीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:02 IST

औरंगाबाद : महावीर चौक ते हर्सूल टी पॉईंट पर्यंतचा रस्ता व्हीआयपी म्हणून घोषित केला आहे. या रस्त्यावर चार दिवसांपूर्वी ...

औरंगाबाद : महावीर चौक ते हर्सूल टी पॉईंट पर्यंतचा रस्ता व्हीआयपी म्हणून घोषित केला आहे. या रस्त्यावर चार दिवसांपूर्वी मोठ-मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. शनिवारी दिवसभरात पाच गंभीर अपघात झाले. इंडियन रोड काँग्रेसने ठरवून दिलेल्या नियमानुसार गतिरोधक टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे.

केंद्र शासन ‘फास्टॅग’मुळे राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधक काढून टाकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. औरंगाबाद शहरात प्रशासन सर्व निकष नियम धाब्यावर बसवून चक्क व्हीआयपी रोडवर मोठमोठे गतिरोधक टाकत आहे. डांबरी रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा उपयोग करून शहरातील व्हीआयपी रोडवर एकूण पाच ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. किलेअर्क येथे दोन, जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर एक, हिमायतबाग येथे दोन गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. गरजेपेक्षा जास्त उंची आहे. वाहनधारकांना गतिरोधक नव्हे, तर टेकडी वाटत आहे.

व्हीआयपी रोडवर गतिरोधक टाकलेच कसे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाकण्यात आलेल्या सर्व गतिरोधक काढून टाकावेत. गतिरोधक टाकायचे असतील तर छोटे रबरचे गतिरोधक टाकावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

चौकट..

दिवसभरात पाच अपघात

काही वाहनधारकांना गतिरोधक दिसत नाही का, मुळे अचानक ब्रेक मारत आहेत. त्यामुळे पाठीमागील वाहन येऊन धडकत आहे. काही वाहनधारक गतिरोधकावरून घसरून पडत आहेत. शनिवारी दिवसभरात पाच अपघात झाले.