शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

विकासाची नव्हे, दुर्लक्षाची ‘हद्द’ वाढली !

By admin | Updated: December 29, 2014 00:56 IST

उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला!

उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला! अन् काही खांबावरील पथदिवे़़ गावातील एकही रस्ता धड नाही़़़ देवळासमोरून गटारीचं पाणी वाहतय़़़ त्या पाण्यातूनच देवळात जावं लागतय़़ झोपडपट्टी भागात वर्षभरापासून पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही़़ अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा हद्दवाढीत उस्मानाबाद शहरात समाविष्ठ झालेल्या राघुचीवाडी येथील नागरीकांनी ‘लोकमत’शी बोलताना वाचला ! गावात घंटागाडी येत नाही, ना लोकप्रतिनिधीकडून विचारणा होते, अशी खंतही अनेकांनी व्यक्त केली़सन २००८ मध्ये उस्मानाबाद शहराची हद्दवाढ झाली़ शहरापासून साडेसहा ते सात किलोमीटर अंतरावर वसलेल्या राघुचीवाडी या गावाचा समावेश झाला़ राघुचीवाडी ग्रुपग्रामपंचायतीत असलेल्या केकस्थळवाडी आणि जाधववाडी ही गावेही शहराला जोडण्यात आली़ गावाचा शहरात समावेश झाल्यापासून ग्रामस्थांनी याला विरोध सुरू केला आहे़ साधारणत: २५०० लोकवस्तीच्या या गावात ना धड रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे! एक ना अनेक समस्यांनी ग्रामस्थांना ग्रासले आहे़ गावातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत ‘लोकमत’ने रविवारी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधला़ त्यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्न समोर मांडले़ गावात प्रवेश केल्यानंतर साधारणत: ८० मीटरपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे़ प्रारंभी गावातील चांगले वाटणारे रस्ते नंतर खड्डे आणि दगडामुळे चालायलाही नकोशे वाटतात़ गावातील एकही गटार व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे़ गावाच्या मध्यभागी असलेल्या मारूती मंदिराच्या पायऱ्या चढायच्या म्हटले तरी गटारीचे पाणी तुडवतच मंदिरात जावे लागते़ गावात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो़ नगर पालिकेने घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याची सोय केली़ मात्र, राघुचीवाडी गावात कधी घंटागाडी फिरकलीच नाही़ स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही पत्ता नाही़ परिणामी गावातील स्वच्छतेच्या समस्या कायम आहेत़ गावाच्या कडेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकी उभारण्यात आली आहे़ ही टाकी कालबाह्य झाली असून, ठिकठिकाणी गळती लागली आहे़ टाकी केव्हा कोसळेल याचा पत्ता नाही़ त्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे़ अशा धोकादायक टाकीत पाण्याचा साठा करून अर्ध्या गावाला पुरवठा होत आहे़ झोपडपट्टी भागातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाली आहे़ त्यामुळे दारात नळ असतानाही गत वर्ष-दीड वर्षापासून ग्रामस्थांना हातपंपाचे पाणी भरावे लागत आहे़ गाव पालिका हदीत गेल्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, गावाला पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या संदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल केली असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.न.प.ची पावती, नाव ग्रामपंचायतीचेराघुचीवाडी येथील विठ्ठल शंकर कसपटे यांनी आॅगस्टमध्ये आठ अ साठी ९३० रूपये व १५० रूपये असा विविध करांचा भरणा केला आहे़ त्याबद्दल पालिकेने त्यांना पावती दिली असून, ग्रामपंचायत राघुचीवाडी हा उल्लेख त्यावर आहे़ केवळ गावाचे नाव असते तर ठिक मात्र, त्यात ग्रामपंचायतीचा उल्लेख असल्याने गावात राहतो की शहरात राहतो ? हा प्रश्न कायम असल्याचेही अनेकांनी सांगितले़ तर भरत माळी यांनी अंबुबाई माळी यांच्या नावावर आठ अ काढण्यासाठी तीन-चार महिन्यापूर्वी ६८०० रूपये पालिकेत भरले आहेत़ चार महिने झाले मात्र, विविध कारणास्तव प्रमाणपत्र दिले नसल्याचे भरत माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)