शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची नव्हे, दुर्लक्षाची ‘हद्द’ वाढली !

By admin | Updated: December 29, 2014 00:56 IST

उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला!

उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला! अन् काही खांबावरील पथदिवे़़ गावातील एकही रस्ता धड नाही़़़ देवळासमोरून गटारीचं पाणी वाहतय़़़ त्या पाण्यातूनच देवळात जावं लागतय़़ झोपडपट्टी भागात वर्षभरापासून पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही़़ अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा हद्दवाढीत उस्मानाबाद शहरात समाविष्ठ झालेल्या राघुचीवाडी येथील नागरीकांनी ‘लोकमत’शी बोलताना वाचला ! गावात घंटागाडी येत नाही, ना लोकप्रतिनिधीकडून विचारणा होते, अशी खंतही अनेकांनी व्यक्त केली़सन २००८ मध्ये उस्मानाबाद शहराची हद्दवाढ झाली़ शहरापासून साडेसहा ते सात किलोमीटर अंतरावर वसलेल्या राघुचीवाडी या गावाचा समावेश झाला़ राघुचीवाडी ग्रुपग्रामपंचायतीत असलेल्या केकस्थळवाडी आणि जाधववाडी ही गावेही शहराला जोडण्यात आली़ गावाचा शहरात समावेश झाल्यापासून ग्रामस्थांनी याला विरोध सुरू केला आहे़ साधारणत: २५०० लोकवस्तीच्या या गावात ना धड रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे! एक ना अनेक समस्यांनी ग्रामस्थांना ग्रासले आहे़ गावातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत ‘लोकमत’ने रविवारी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधला़ त्यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्न समोर मांडले़ गावात प्रवेश केल्यानंतर साधारणत: ८० मीटरपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे़ प्रारंभी गावातील चांगले वाटणारे रस्ते नंतर खड्डे आणि दगडामुळे चालायलाही नकोशे वाटतात़ गावातील एकही गटार व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे़ गावाच्या मध्यभागी असलेल्या मारूती मंदिराच्या पायऱ्या चढायच्या म्हटले तरी गटारीचे पाणी तुडवतच मंदिरात जावे लागते़ गावात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो़ नगर पालिकेने घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याची सोय केली़ मात्र, राघुचीवाडी गावात कधी घंटागाडी फिरकलीच नाही़ स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही पत्ता नाही़ परिणामी गावातील स्वच्छतेच्या समस्या कायम आहेत़ गावाच्या कडेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकी उभारण्यात आली आहे़ ही टाकी कालबाह्य झाली असून, ठिकठिकाणी गळती लागली आहे़ टाकी केव्हा कोसळेल याचा पत्ता नाही़ त्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे़ अशा धोकादायक टाकीत पाण्याचा साठा करून अर्ध्या गावाला पुरवठा होत आहे़ झोपडपट्टी भागातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाली आहे़ त्यामुळे दारात नळ असतानाही गत वर्ष-दीड वर्षापासून ग्रामस्थांना हातपंपाचे पाणी भरावे लागत आहे़ गाव पालिका हदीत गेल्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, गावाला पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या संदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल केली असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.न.प.ची पावती, नाव ग्रामपंचायतीचेराघुचीवाडी येथील विठ्ठल शंकर कसपटे यांनी आॅगस्टमध्ये आठ अ साठी ९३० रूपये व १५० रूपये असा विविध करांचा भरणा केला आहे़ त्याबद्दल पालिकेने त्यांना पावती दिली असून, ग्रामपंचायत राघुचीवाडी हा उल्लेख त्यावर आहे़ केवळ गावाचे नाव असते तर ठिक मात्र, त्यात ग्रामपंचायतीचा उल्लेख असल्याने गावात राहतो की शहरात राहतो ? हा प्रश्न कायम असल्याचेही अनेकांनी सांगितले़ तर भरत माळी यांनी अंबुबाई माळी यांच्या नावावर आठ अ काढण्यासाठी तीन-चार महिन्यापूर्वी ६८०० रूपये पालिकेत भरले आहेत़ चार महिने झाले मात्र, विविध कारणास्तव प्रमाणपत्र दिले नसल्याचे भरत माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)