शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

विकासाची नव्हे, दुर्लक्षाची ‘हद्द’ वाढली !

By admin | Updated: December 29, 2014 00:56 IST

उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला!

उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला! अन् काही खांबावरील पथदिवे़़ गावातील एकही रस्ता धड नाही़़़ देवळासमोरून गटारीचं पाणी वाहतय़़़ त्या पाण्यातूनच देवळात जावं लागतय़़ झोपडपट्टी भागात वर्षभरापासून पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही़़ अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा हद्दवाढीत उस्मानाबाद शहरात समाविष्ठ झालेल्या राघुचीवाडी येथील नागरीकांनी ‘लोकमत’शी बोलताना वाचला ! गावात घंटागाडी येत नाही, ना लोकप्रतिनिधीकडून विचारणा होते, अशी खंतही अनेकांनी व्यक्त केली़सन २००८ मध्ये उस्मानाबाद शहराची हद्दवाढ झाली़ शहरापासून साडेसहा ते सात किलोमीटर अंतरावर वसलेल्या राघुचीवाडी या गावाचा समावेश झाला़ राघुचीवाडी ग्रुपग्रामपंचायतीत असलेल्या केकस्थळवाडी आणि जाधववाडी ही गावेही शहराला जोडण्यात आली़ गावाचा शहरात समावेश झाल्यापासून ग्रामस्थांनी याला विरोध सुरू केला आहे़ साधारणत: २५०० लोकवस्तीच्या या गावात ना धड रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे! एक ना अनेक समस्यांनी ग्रामस्थांना ग्रासले आहे़ गावातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत ‘लोकमत’ने रविवारी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधला़ त्यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्न समोर मांडले़ गावात प्रवेश केल्यानंतर साधारणत: ८० मीटरपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे़ प्रारंभी गावातील चांगले वाटणारे रस्ते नंतर खड्डे आणि दगडामुळे चालायलाही नकोशे वाटतात़ गावातील एकही गटार व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे़ गावाच्या मध्यभागी असलेल्या मारूती मंदिराच्या पायऱ्या चढायच्या म्हटले तरी गटारीचे पाणी तुडवतच मंदिरात जावे लागते़ गावात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो़ नगर पालिकेने घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याची सोय केली़ मात्र, राघुचीवाडी गावात कधी घंटागाडी फिरकलीच नाही़ स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही पत्ता नाही़ परिणामी गावातील स्वच्छतेच्या समस्या कायम आहेत़ गावाच्या कडेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकी उभारण्यात आली आहे़ ही टाकी कालबाह्य झाली असून, ठिकठिकाणी गळती लागली आहे़ टाकी केव्हा कोसळेल याचा पत्ता नाही़ त्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे़ अशा धोकादायक टाकीत पाण्याचा साठा करून अर्ध्या गावाला पुरवठा होत आहे़ झोपडपट्टी भागातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाली आहे़ त्यामुळे दारात नळ असतानाही गत वर्ष-दीड वर्षापासून ग्रामस्थांना हातपंपाचे पाणी भरावे लागत आहे़ गाव पालिका हदीत गेल्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, गावाला पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या संदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल केली असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.न.प.ची पावती, नाव ग्रामपंचायतीचेराघुचीवाडी येथील विठ्ठल शंकर कसपटे यांनी आॅगस्टमध्ये आठ अ साठी ९३० रूपये व १५० रूपये असा विविध करांचा भरणा केला आहे़ त्याबद्दल पालिकेने त्यांना पावती दिली असून, ग्रामपंचायत राघुचीवाडी हा उल्लेख त्यावर आहे़ केवळ गावाचे नाव असते तर ठिक मात्र, त्यात ग्रामपंचायतीचा उल्लेख असल्याने गावात राहतो की शहरात राहतो ? हा प्रश्न कायम असल्याचेही अनेकांनी सांगितले़ तर भरत माळी यांनी अंबुबाई माळी यांच्या नावावर आठ अ काढण्यासाठी तीन-चार महिन्यापूर्वी ६८०० रूपये पालिकेत भरले आहेत़ चार महिने झाले मात्र, विविध कारणास्तव प्रमाणपत्र दिले नसल्याचे भरत माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)