शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जमावबंदी नव्हे; प्रतिबंधात्मक १४४ कलम

By admin | Updated: March 19, 2016 00:55 IST

लातूर : पाणीपुरवठ्यास व्यत्यय आणणाऱ्यांना जरब बसावी म्हणून प्रतिबंधात्मक १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन किंवा दमदाटी करून

लातूर : पाणीपुरवठ्यास व्यत्यय आणणाऱ्यांना जरब बसावी म्हणून प्रतिबंधात्मक १४४ कलम लागू करण्यात आले आहे. पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन किंवा दमदाटी करून टँकर आपल्या भागात नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यासाठी हे १४४ कलम लागू केले आहे. पाणी भरण्यासाठी लोक एकत्र जमले तर त्यासाठी हे कलम लागू नाही. परीक्षा केंद्रावर जसे परीक्षेस अडथळा आणल्याविरुद्ध हे कलम लागू होते, मतदान केंद्राबाहेर मतदान करण्यास अडथळा होतो, तसे जलकुंभावर पाणी वाटपात अडथळा होत आहे म्हणून हे १४४ कलम लागू होणार आहे. हे कलम पाणी भरण्यास मनाई करीत नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिले. सध्या लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून पाणी आणले जात आहे. जेथून पाणी आणले जात आहे, तेथील लोकांचाही विरोध होत आहे. शिवाय, पाणी मिळावे म्हणून काही लोक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करतात, तर काही जण टँकर आपल्या भागात पळवितात, याला आळा बसावा म्हणून १४४ कलम लागू केले आहे. तो जमावबंदीचा आदेश नाही. १४४ कलमांबाबत झालेल्या संभ्रमाबाबत दुरुस्ती करण्यात आली असून, केवळ पाण्याच्या टाकीवर चढणे आणि टँकर पळविण्याबाबत हे कलम लागू करण्यात आले आहे. शहरातील जे मुख्य सहा टँकर पॉर्इंट आहेत, त्या ठिकाणीच १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सरस्वती कॉलनी येथील जलकुंभ, आर्वी रोड येथील जलकुंभ, गांधी चौक येथील जलकुंभ, नांदेड नाका येथील जलकुंभ, क्वाईल नगर येथील जलकुंभ या ठिकाणी १४४ कलम लागू असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)