शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आवक नसलेल्या शेतमालाचाही सौदा!

By admin | Updated: March 11, 2017 23:45 IST

लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज होणारी शेतमालाची आवक ही अनिश्चित असते़

लातूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज होणारी शेतमालाची आवक ही अनिश्चित असते़ त्यामुळे त्याचे दरही दररोज कमी जास्त होत असतात़ विशेष म्हणजे सौद्याच्या वेळी जो शेतमाल असतो त्यातच लिलाव होतो़ मात्र लातुरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी पाच प्रकारच्या शेतमालाची आवक शून्य असतानाही त्याचा सौदा निघाला आहे़ पाचपैकी दोन धान्याचा कमाल, किमान व सर्वसाधारण असा दरही जाहीर झाला़ बाजार समितीच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे़ गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने खरिपाबरोबर रबी हंगामातील पिकांना लाभ झाला आहे़ सध्या बहुतांश शेतकरी तूर व हरभऱ्याच्या राशी करण्यात मग्न आहेत़ ज्या शेतकऱ्यांच्या राशी झाल्या आहेत ते शेतकरी विक्रीसाठी शेतमाल बाजार समितीत आणत आहेत़ त्यामुळे आवक वाढत आहे़ त्याचबरोबर लातुरातील बाजार समितीत चांगला दर मिळतो, असा अनेक शेतकऱ्यांना अनुभव असल्याने जिल्ह्याबरोबर सीमावर्ती भागातील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणतात़शुक्रवारी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत १३ प्रकारच्या शेतमालाची आवक झाली़ त्यात सर्वाधिक आवक हरभरा, तूर आणि सोयाबीनची झाली असून, बाजरी, गहू, ज्वारी, मका, मूग, करडई, गूळ या शेतमालाची आवक अल्पप्रमाणात झाली होती़ एकूण आवक ३२ हजार २८४ क्विंटल झाली होती़ अंबाडी, जवस, कारळे, धने, मोहरी या शेतमालाची आवक झाली नसतानाही त्याचा सौदा पुकारण्यात आला़ वास्तविक पाहता दररोज आवक होणाऱ्या शेतमालाची पाहणी करून त्याचा सौदा होतो़ मात्र शुक्रवारी या पाच प्रकारच्या शेतमालाची आवक नसतानाही सौदा काढण्यात आला असल्याचे दिसून येत आहे़