शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय योजनेत मनपा नापास!

By admin | Updated: May 9, 2016 00:06 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले.

औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शहरी भागात घर तिथे शौचालय उपक्रम हाती घेण्यात आला. औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने २ कोटी ६७ लाख ६२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शासनाच्या या उपक्रमाला छेद देण्याचा प्रयत्न मनपाने केला. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत मनपा अधिकाऱ्यांची बरीच कानउघाडणी करण्यात आली.२०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद शहरात ११ हजार ९९७ नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. मनपाने खाजगी प्रकल्प सल्लागार संस्था नेमून सर्वेक्षणही करून घेतले. सर्वेक्षणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने एका दिवसात मनपाला सर्वेक्षण पूर्ण केल्याचा खळबळजनक अहवालही दिला. या अहवालावरून प्रशासनाने फक्त १५३ लाभार्थ्यांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला. त्यातील ४० ते ५० लाभार्थ्यांनीच शौचालये बांधली. महापालिकेने या योजनेत ज्या पद्धतीने काम करायला हवे त्या पद्धतीने केले नाही. या योजनेचा आढावा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत घेण्यात आला. मनपाच्या या भोंगळ कारभारावर राज्य शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली.