शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

शौचालय योजनेत मनपा नापास!

By admin | Updated: May 9, 2016 00:06 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले.

औरंगाबाद : केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करीत स्वच्छ भारत मिशन अभियान सुरू केले. या अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनानेही आॅगस्ट २०१५ स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत शहरी भागात घर तिथे शौचालय उपक्रम हाती घेण्यात आला. औरंगाबाद शहरासाठी राज्य शासनाने २ कोटी ६७ लाख ६२ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. शासनाच्या या उपक्रमाला छेद देण्याचा प्रयत्न मनपाने केला. त्यामुळे शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत मनपा अधिकाऱ्यांची बरीच कानउघाडणी करण्यात आली.२०११ च्या जनगणनेनुसार औरंगाबाद शहरात ११ हजार ९९७ नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नसल्याचे समोर आले. मनपाने खाजगी प्रकल्प सल्लागार संस्था नेमून सर्वेक्षणही करून घेतले. सर्वेक्षणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने एका दिवसात मनपाला सर्वेक्षण पूर्ण केल्याचा खळबळजनक अहवालही दिला. या अहवालावरून प्रशासनाने फक्त १५३ लाभार्थ्यांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला. त्यातील ४० ते ५० लाभार्थ्यांनीच शौचालये बांधली. महापालिकेने या योजनेत ज्या पद्धतीने काम करायला हवे त्या पद्धतीने केले नाही. या योजनेचा आढावा शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत घेण्यात आला. मनपाच्या या भोंगळ कारभारावर राज्य शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली.