शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

नोटाबंदीचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांची पाठ सोडेना!

By admin | Updated: March 31, 2017 00:17 IST

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेत रबी विम्याची रक्कम जमा झाली

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेत रबी विम्याची रक्कम जमा झाली असून, सुमारे ४३ कोटी रूपयांचे वाटप करताना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नोटाबंदीचे संकट गहिरेच राहण्याचा अंदाज आहे. कोट्यवधी रूपये वाटप करण्यासाठी नोटा मिळतात की नाही याबाबत अधिकाऱ्यांनीच साशंकता व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील ४ लाख ९६ हजार ७१२ शेतकऱ्यांनी २०१५ या वर्षात ६ कोटी १८ लाख २७ हजार २४४ एवढा रबी विमा भरला होता. यातून शेतकऱ्यांना ४३ कोटी १२ लाख ९५ हजार २२७ एवढा विमा मंजूर झाला आहे. २०१५-१६ हंगामातील रबी पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मुख्य कार्यालयाकडून बँकेत वर्ग करण्यात आली आहे. मात्र मध्यवर्ती बँकेची करन्सी चेस्ट असलेल्या बँका एवढी रक्कम कधी व कशी देणार हा मोठा प्रश्न बँक अधिकारी उपस्थित करीत आहेत. एवढ्या रक्कमेसाठी बँकेला दररोज पाच लाख रूपयांची रक्कम अपेक्षित आहे. पाच लाख रूपये मिळाल्यास शेतकऱ्यांना कमी जास्त करून रक्कम वितरित करण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर व्यवस्थापक डब्ल्यू.एस. कदम म्हणाले, पीक विमा वाटप करण्याचे आदेश बँकेला प्राप्त झाले आहेत. मार्चएंडची कामे उरकल्यावर विमा वाटप करण्यात येणार आहे. मात्र यासाठी नोटांचा तुटवडा भासू शकतो. दिवसाकाठी सुमारे पाच लाखांचे चलन लागेल. ६४ शाखेत एकाच वेळी गर्दी होणार असल्याने नोटांची टंचाई जाणवू शकते असा अंदाज कदम यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)