शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

जिल्ह्यात दोन वर्षांच्या कालावधीत बालमजुरांच्या ना नोंदी, ना पुनर्वसन

By admin | Updated: April 8, 2017 21:43 IST

लातूर :गेल्या दोन वर्षात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने या बालकांचे पुनर्वसन केले नाही

लातूर : बालकामगार विरोधी कायद्यांतर्गत धाडी टाकून बालमजूर, अडचणीत सापडलेल्या मुलांची त्यातून मुक्तता करण्याबरोबर त्यांचे पुनर्वसन करणे कायद्याने बंधनकारक आहे़ मात्र गेल्या दोन वर्षात जिल्हा बालसंरक्षण कक्षाने या बालकांचे पुनर्वसन केले नाही आणि त्या संदर्भातील नोंदीही नसल्याची माहिती समोर आल्याचे बालहक्क अभियानच्या जिल्हा निमंत्रक सविता कुलकर्णी यांनी पत्रपरिषदेत शनिवारी सांगितले़ बालहक्क अभियानच्या वतीने गेल्या वर्षी जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, रेणापूर आणि लातूर या तीन तालुक्यातील शाळांची स्थिती, बालसंरक्षण, बालकामगार या संदर्भात सर्व्हेक्षण करण्यात आले़ या सर्व्हेक्षणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्याचे सांगून कुलकर्णी म्हणाल्या, जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर या तालुक्यात तालुका बालसंरक्षण समितीची अद्याप स्थापना करण्यात आली नाही़ तसेच जिल्ह्यातील तालुका बालसंरक्षण समितीने बालमजुरा संदर्भातील अथवा अडचणीत सापडलेल्या मुलांसंदर्भातील प्रकरणे हताळल्याची आणि त्यासंदर्भात निधी किती खर्च झाला, याची नोंद ठेवण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ तसेच जिल्ह्यातील ११ शाळांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असता त्यात मूलभूत सुविधांचाही अभाव आढळून आला आहे़ कुठे संरक्षण भिंत, शौचालय तर कुठे वाचनालय मध्यान्ह भोजनाची व्यवस्थित सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले आहे़