शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अनुकंपात आरक्षण नको

By admin | Updated: September 15, 2015 00:36 IST

औरंगाबाद : अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीत ‘राखीव’ आणि ‘अराखीव’ असा भेदाभेद करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे

औरंगाबाद : अनुकंपा तत्त्वावरील नेमणुकीत ‘राखीव’ आणि ‘अराखीव’ असा भेदाभेद करता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ए.व्ही. निरगुडे आणि न्या. व्ही.के. जाधव यांनी दिला आहे. अनुकंपा तत्त्वाच्या धोरणांतर्गत पाच टक्के जागा आरक्षित केल्या असताना पुन्हा त्या पाच टक्के जागांमध्ये ‘राखीव’ आणि ‘अराखीव’ असा वर्ग तयार करणे म्हणजे आरक्षणात पुन्हा आरक्षण ठेवल्यासारखे होते, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने १३ जून २००३ च्या शासन निर्णयाद्वारे अनुकंपा तत्त्वावर एकूण नेमणुकीच्या पाच टक्के जागा आरक्षित केल्या आहेत. शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अवलंबून असलेल्या त्याच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीस अथवा पाल्यास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय मानवीय दृष्टिकोनातून, मयताच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी घेण्यात आला होता. त्यासाठी एकूण जागांच्या ५ टक्के कोटा आरक्षित केला आहे. यासाठी निर्धारित कार्यपद्धतीसुद्धा वेळोवेळी आखून देण्यात आली आहे. लाभार्थीने विहित मुदतीत संबंधित खात्यास आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावयाचा असतो. जिल्हाधिकारी कार्यालयात यादी अनुक्रमांक तयार केले जातात. जागेच्या उपलब्धतेनुसार संबंधित खात्याकडे नावे पाठविली जातात. उमेदवाराच्या पात्रतेनुसार त्याला नेमणूक देण्याचे आदेश जिल्हाधिकारी देतात.अर्जदार बालाजी सीताराम मोरे यांचे वडील नांदेड येथील आरटीओ कार्यालयात कार्यरत असताना ७ सप्टेंबर १९९७ रोजी वारले. अर्जदाराने अनुकंपा तत्त्वावर अर्ज सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला ‘वॉचमन’ या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याची शिफारस केली. अर्जदार हे महादेव कोळी (एस.टी.) या अनुसूचित जमातीचे असल्यामुळे त्यांना नेमणूक देताना वैधता प्रमाणपत्राच्या अधीन राहून दिली. जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नेमणूक दिली जाईल, अशा अटीवर आदेश काढले. अर्जदाराने सदर आदेशास अ‍ॅड. अनिल गोलेगावकर आणि अ‍ॅड. मधुर गोलेगावकर यांच्या मार्फत आव्हान दिले असता खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला. या प्रकरणात शासनाच्या वतीने अ‍ॅड. डी.बी. भांगे यांनी काम पाहिले.