शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पगारी नाहीत, वसुलीला रोखू नका...

By admin | Updated: February 9, 2016 00:24 IST

उस्मानाबाद : रबी हंगाम २०१४-१५ ची ४६.२५ लाखांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहे.

उस्मानाबाद : रबी हंगाम २०१४-१५ ची ४६.२५ लाखांची रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी जिल्हा बँकेकडे प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून सदर रकमा वर्ग करण्याचे काम सुरू असतानाच बँक कर्मचाऱ्यांनीही वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या पगारी झालेल्या नाहीत. त्यामुळे विम्याच्या रकमेतून थकित रकमा वसूल कराव्यात, अशी मागणी केल्याने याप्रकरणी जिल्हा बँक समन्वयाने कसा मार्ग काढते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.रबी हंगाम २०१४-१५ साठी जिल्हा बँकेकडे ४६.२५ लाखांची रक्कम प्राप्त झाली आहे. सदर रकमेचे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी याद्या करण्याचे कामही बँकेने हाती घेतले आहे. याच अनुषंगाने सोमवारी सर्किट हाऊसवर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत बँकेतील सत्ताधारी संचालकांची बैठक पार पडली. मागील चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी तीव्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या विमा रकमेतून थकबाकी वसूल करणे योग्य होणार नाही. त्यामुळे पीक विम्यातून कर्जाची रक्कम कपात न करता संबंधित शेतकऱ्यांना रकमा वितरित कराव्यात, असे निर्देश आ. पाटील यांनी या बैठकीत संचालकांना दिले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, उपाध्यक्ष कैैलास शिंदे यांच्यासह सत्ताधारी संचालकांनी आ. पाटील यांच्या या सूचनेला संमती दर्शविली. या बैठकीनंतर बँकेचे अध्यक्ष देशमुख यांनी जिल्हा बँकेत कार्यकारी संचालकासह अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विम्याच्या रकमा थकबाकी वसूल न करता शेतकऱ्यांना वितरित करण्याचे निर्देश दिले. मात्र, या निर्णयाला जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मागील सहा महिन्यांपासून पगारी झालेल्या नाहीत. अनेकांकडे वर्षानुवर्षाची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल न झाल्यास बँकेचा परवाना अडचणीत येवून बँक बंद करण्याची नामुष्की येईल. जिल्हा बँकही शेतकऱ्यांचीच आहे. त्यामुळे वसुलीसाठी सहकार्य करून बँक कशी उभी राहील, हे पहावे, असे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संचालकांना सुनावल्याचे समजते. थकबाकी वसुलीचे रिझर्व्ह बँकेचे स्पष्ट निर्देश असल्याचेही या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने पीक विम्याच्या रकमेतून थकित वसुली होणार की जिल्हा बँक रकमा थेट वितरित करणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. जिल्हा बँक संचालकांचीही ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली असून, यातून काय तोडगा निघतो, याकडे आता लक्ष लागले आहे.