शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

कर्जमाफी नाही, खोटे गुन्हे दाखल केले

By admin | Updated: June 12, 2017 00:31 IST

औरंगाबाद :राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र सहकार संस्था कायद्यातील तरतुदीनुसार ५२ सहकारी सोसायट्यांच्या ८ कोटी ५२ लाख रुपयांच्या कर्जाचे निर्लेखन केलेले आहे. या सोसायट्यांना बँकेने कर्जमाफी दिलेली नसून त्यांच्याकडील कर्जवसुलीसाठी ४९ सोसायट्यांविरुद्ध न्यायालयात दावे दाखल केलेले आहेत, असे असताना राजकीय हेतूने आमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप आमदार अब्दुल सत्तार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. मर्जीतील ५२ सोसायट्यांना बेकायदा ८ कोटी ५२ लाख रुपयांची कर्जमाफी दिल्याप्रकरणी अ‍ॅड. सदाशिव गायके यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात बँकेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेत जबाब नोंदविल्यानंतर आ. सत्तार यांनी रविवारी दुपारी सुभेदारी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, संचालक मंडळाने बँकेच्या हितासाठी ५२ सहकारी सोसायट्यांचे ८ कोटी ५२ लाख रुपयांचे कर्ज निर्लेखन केले. निर्लेखन म्हणजे कर्जमाफी नाही.याविषयी तक्रारदार गायके यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहकार निबंधक आणि ग्रामीण पोलिसांनीही चौकशी केली होती. शिवाय शहर गुन्हे शाखा दोन वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी करीत आहे; मात्र आताच हा गुन्हा का दाखल करण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यशस्वी झाले. यामुळे भाजपने राजकीय हेतूने आम्हाला बदनाम करण्यासाठी ठरवून गुन्हे नोंदविले. औरंगाबादसह राज्यातील सर्वच बँकांनी अशाप्रकारे बुडीत सोसायट्यांचे कर्ज निर्लेखन केलेले आहे. असे असताना केवळ औरंगाबादेतच गुन्हे कसे नोंदविले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. औरंगाबादेतील बँकेच्या संचालक ांविरुद्ध ज्या आरोपाखाली गुन्हे नोंदविले, तसेच गुन्हे राज्यातील अन्य जिल्हा सहकारी बँकांच्या संचालक मंडळाविरुद्धही नोंदवावेत, यासाठी आमचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार करणार असल्याचे आ. सत्तार म्हणाले.