शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

महापालिका, पोलीस व्यवस्थेचे वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:20 IST

यंदा विसर्जन मिरवणुकीत महापालिकेने काहीच नियोजन केले नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव होय. गणेशोत्सवानिमित्त खड्ड्यांची डागडुजी करण्यासह विसर्जन मिरवणुकीत भक्तांना सोयीसुविधा देण्याचे काम महापालिकेचे आहे. मात्र, यंदा विसर्जन मिरवणुकीत महापालिकेने काहीच नियोजन केले नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. मुख्य विसर्जन मार्गावर विद्युत व्यवस्थेचा अभाव, जागोजागी मोबाइल टॉयलेट नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. सर्वात कहर म्हणजे गुलमंडी येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने लाखो गणेशभक्तांना दुर्गंधीमुळे प्रचंड यातना सहन कराव्या लागत होत्या.गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच मनपाच्या पदाधिकाºयांनी खड्ड्यांची डागडुजी करा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानंतर मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर आजारी पडले. त्यामुळे विसर्जनाच्या तयारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. महापौरही ९ सप्टेंबर रोजी होणाºया महापौर परिषदेच्या तयारीनिमित्त व्यस्त झाले. महापालिकेच्या विद्युत विभागाने मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर शंभर टक्के विद्युत व्यवस्था केल्याचा दावा केला. प्रत्यक्षात हा दावा मंगळवारी रात्री फोल ठरला. गुलमंडी, पैठणगेट, सिटीचौक, रंगारगल्ली अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. या भागातील सर्व पथदिवेही बंद ठेवण्यात आले होते. दरवर्षी मनपातर्फे ठिकठिकाणी मोबाइल टॉयलेट, गणेश भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येते. यंदा अशी व्यवस्था दिसून आली नाही. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये महापालिकेच्या विरोधात संतापाची लाट पसरली होती.