शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

मुंडेंसोबत युती नव्हे ऋणानुबंध-ठाकरे

By admin | Updated: October 8, 2014 00:53 IST

बीड: गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे ऋणानुबंध भावनिक पातळीवरचे होते. युती असताना जागा वाटपाची चर्चा व्हायची आणि ते हक्काने जागा मागायचे.

बीड: गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे ऋणानुबंध भावनिक पातळीवरचे होते. युती असताना जागा वाटपाची चर्चा व्हायची आणि ते हक्काने जागा मागायचे. ते असते तर मला बीडला यायची गरज भासली नसती, असे सांगत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यामुळेच परळीत आणि लोकसभेसाठीही आम्ही उमेदवार दिला नाही, असे स्पष्ट केले.येथील चंपावती मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते़ बीडचे उमेदवार अनिल जगताप, कल्पना नरहिरे, सतीश सोळुंके, अजय दाभाडे, अशोक दहिफळे, उपजिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांची उपस्थिती होती़ ठाकरे म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अंत्यसंस्कार प्रसंगी त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी माझ्याकडे केली होती़ त्या चौकशीचे पुढे काय झाले ? हे समजू शकले नाही़ लोकसभेसाठी वापर केलाभाजपाचे लोकसभेत केवळ दोन खासदार असताना स्व़ बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई पोटनिवडणूक जिंकल्यानंतर जाहीर सभेत भाजपा सोबत युती करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २५ वर्ष युती टिकली. सर्व काही योग्य चालले असताना भाजपाने युती तोडण्याचा निर्णय घेऊन काळजात कट्यार घुसविण्याचे काम केले. भाजपाची सत्ता आल्यानंतर त्यांना मित्र पक्षाची आठवण झाली नाही़ लोकसभेसाठी भाजपाने शिवसेनेचा वापर केला असल्याचा घणघाती आरोपही त्यांनी केला़ मोदीं हे नवीन शहेंशाहमहाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करण्याची भाषा भाजपावाले करीत आहेत. एका बाजुला भ्रष्टाचार करणारी काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आहेत तर दुसऱ्या बाजुला अफजल खानच्या संकटाप्रमाणे नवीन शहेंशाह ची फौज आहे. मी भाजपाला अफजल खानची फौज म्हणालो नाही. मी टोपी फेकली तुम्ही का घातली, असे ठाकरे म्हणाले. दरम्यान, नवीन शहेंशाह असल्याचे ठाकरे यांनी मोदी यांचे नाव न घेता सांगितले.लोकसभा निवडणुकीसाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे तर परळी विधानसभा मतदार संघासाठी पंकजा पालवे उभ्या आहेत. या दोघी निवडून आल्याच पाहिजेत असे ठाकरे यांनी म्हटले. त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारासाठी भाजपाला पाठिंबा तर विधानसभेसाठी नसल्याचा संकेत त्यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)