शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

महापालिकेने ३ लाख ३७ हजार कोरोना चाचण्या केल्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:21 IST

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजवर महापालिकेने शहरात ३ लाख ३७ हजार ८८० नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या. ...

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजवर महापालिकेने शहरात ३ लाख ३७ हजार ८८० नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या. त्यातील ३१ हजार ५४ नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले. तर २ लाख ७७ हजार ३८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा दावा मनपाने केला आहे.

१८ मार्च २०२० पासून शहरात कोरोना संसर्गाची लागण होण्यास सुरुवात झाली. संसर्गाने संपूर्ण शहराला विळखा घातला. दिवसाकाठी ५०० ते ८०० रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा चाचण्यांवर भर दिला आहे. दिवाळीनंतर शहरात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

दिल्लीत आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशन, विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी मनपाने सुरू केली. शहरातील कोरोना चाचणी केंद्र आणि मोबाईल टीमच्या माध्यमातून कोरोना चाचण्या होत आहेत. चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे.

सध्या ६७४ रुग्णांवर उपचार

शहरात घाटी, जिल्हा सामान्य रुग्ण, चिकलठाणा कोविड सेंटरसह पालिकेचे कोविड सेंटर्स आणि खासगी रुग्णालयांत सध्या एकूण ६७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ६५० रुग्ण हे शहरातील आहेत. तर ११ रुग्ण हे ग्रामीण भागातील असून १३ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. घाटी, एमजीएम आणि मेल्ट्रॉन कोविड सेंटरमध्ये जास्तीचे रुग्ण दाखल आहेत.