शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
6
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
7
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
8
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
9
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
12
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
13
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
14
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
15
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
16
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
17
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
18
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
19
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
20
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं

लातूरच्या पाण्यात नायट्रेट

By admin | Updated: May 25, 2015 00:28 IST

सितम सोनवणे , लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मार्च महिन्यात ५६६३ पाणी नमुन्यांपैकी ३५९१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

सितम सोनवणे , लातूरजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मार्च महिन्यात ५६६३ पाणी नमुन्यांपैकी ३५९१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ६७९ पाणी नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. शिवाय, अहमदपूर तालुक्यातील काही गावांत पाणी नमुन्यांत फ्लोराईड आढळले आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंतेत असून, संबंधित ग्रामपंचायतींना त्यांनी शुद्ध पाण्याबाबत सूचना केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात ६१, जळकोट तालुक्यात १३५, लातूर ०१, निलंगा २४५, उदगीर २३७ असे एकूण ६७९ जलस्त्रोतात दोष आढळला आहे. या पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. सदर पाणी पिण्यासाठी हानीकारक असून, शरिराला अपायकारक आहे. त्यातच अहमदपूर तालुक्यात ७ व रेणापूर तालुक्यात १ जलस्त्रोत फ्लोराईडयुक्त आहेत. नायट्रेटपेक्षा फ्लोराईड घातक आहे. वर्षभरापूर्वी राज्य शासनाने फ्लोराईड पाणी असलेल्या गावांत एक मोहीम राबविली होती. या मोहिमेत तेथील पाणी फ्लोराईडमुक्त करण्यासाठी योजना आखली होती. त्यावेळीही अहमदपूर तालुक्यातीलच आठ गावांत फ्लोराईडयुक्त पाणी आढळले होते. आता गेल्या मार्च महिन्यात केलेल्या तपासणीतही अहमदपूर तालुक्यातील सात गावातील जलस्त्रोतात फ्लोराईड आढळले आहे. जिल्ह्यातील ६७९ जलस्त्रोतात आता नायट्रेट आढळले आहे. याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली असून, पाण्यात जर दहा मिलीपेक्षा अधिक नायट्रेट असल्यास लहान मुलांना मिथॅमोग्लोबिनामिया हा आजार होतो. शरीर निळे पडते, आॅक्सीजन कमी होतो, त्यामुळे रुग्ण मुलाला कृत्रिम आॅक्सीजन लावावा लागतो तर मोठ्या माणसांना ब्लडप्रेशर, पोटदुखी, पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्य विभागाने भीती व्यक्त केली आहे.शिवाय, तसे संबंधित ग्रामपंचायतींना सूचना केल्या असून, पाणी स्त्रोताचे शुद्धिकरण करावे, असे पत्र आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना पाठविले आहे. फ्लोराईडचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी रेणापूर तालुक्यातील एका जलस्त्रोत नव्याने वाढला आहे. अहमदपूर तालुक्यात पूर्वी आठ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी आढळले होते. आता सात ठिकाणी फ्लोराईड आढळले आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे हाडे व दात ठिसूळ होणे, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, पोटाचा विकार, लिव्हर, किडनी, हृदय कोशिकेवर परिणाम होणे आदी आजार उद्भवतात. या पद्धतीचे रुग्ण अहमदपूर तालुक्यात आढळले नसले तरी शेजारच्या नांदेड जिल्ह्यात असे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या सातही ठिकाणचे पाणी पिण्यास वापरू नये, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, पाण्यात नायट्रेट आणि फ्लोराईडचे प्रमाण येत असल्यामुळे सर्वच पाणी तपासण्याची मोहीम आरोग्य विभागामार्फत राबविली जाईल.वातावरणातील नायट्रोजन वायूचा संपर्क जमिनीवरील माती व पाण्यासोबत आल्याने नायट्रेटचे मिश्रण पाण्यात होते. आकाशातील वीज निर्मितीमुळेही नायट्रोजन आॅक्साईड तयार होतो. जमीन पाणी व वृक्षाद्वारे नायट्रेट निर्मिती होत असून, रासायनिक खतांचा अति वापर झाल्यानेही नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. जनावरांचे मलमूत्र, घरातील व कारखान्यांतील सांडपाण्याचा जमिनीवर होणारा निचरा हे नायट्रेटचे प्रमाण वाढण्याचे कारण आहे, अशी माहिती जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. सुभाष मद्रेवार यांनी सांगितले. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे दात आणि हाडे ठिसूळ होतात. दात, हाडांचा फ्लोरिसिस असे या आजाराचे नाव आहे. माणसाची वाढही खुंटते. हिमोग्लोबीनचे प्रमाण व पोटाचा विकार उद्भवतो. यामुळे फ्लोराईडयुक्त पाणी घातक आहे. दात ठिसूळच नाही तर पिवळे पडतात, असे दंतरोग तज्ज्ञ डॉ. धनराज शितोळे यांनी सांगितले.