शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

लातूरच्या पाण्यात नायट्रेट

By admin | Updated: May 25, 2015 00:28 IST

सितम सोनवणे , लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मार्च महिन्यात ५६६३ पाणी नमुन्यांपैकी ३५९१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.

सितम सोनवणे , लातूरजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मार्च महिन्यात ५६६३ पाणी नमुन्यांपैकी ३५९१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात ६७९ पाणी नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळले आहे. शिवाय, अहमदपूर तालुक्यातील काही गावांत पाणी नमुन्यांत फ्लोराईड आढळले आहे. यामुळे आरोग्य विभाग चिंतेत असून, संबंधित ग्रामपंचायतींना त्यांनी शुद्ध पाण्याबाबत सूचना केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात ६१, जळकोट तालुक्यात १३५, लातूर ०१, निलंगा २४५, उदगीर २३७ असे एकूण ६७९ जलस्त्रोतात दोष आढळला आहे. या पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे. सदर पाणी पिण्यासाठी हानीकारक असून, शरिराला अपायकारक आहे. त्यातच अहमदपूर तालुक्यात ७ व रेणापूर तालुक्यात १ जलस्त्रोत फ्लोराईडयुक्त आहेत. नायट्रेटपेक्षा फ्लोराईड घातक आहे. वर्षभरापूर्वी राज्य शासनाने फ्लोराईड पाणी असलेल्या गावांत एक मोहीम राबविली होती. या मोहिमेत तेथील पाणी फ्लोराईडमुक्त करण्यासाठी योजना आखली होती. त्यावेळीही अहमदपूर तालुक्यातीलच आठ गावांत फ्लोराईडयुक्त पाणी आढळले होते. आता गेल्या मार्च महिन्यात केलेल्या तपासणीतही अहमदपूर तालुक्यातील सात गावातील जलस्त्रोतात फ्लोराईड आढळले आहे. जिल्ह्यातील ६७९ जलस्त्रोतात आता नायट्रेट आढळले आहे. याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली असून, पाण्यात जर दहा मिलीपेक्षा अधिक नायट्रेट असल्यास लहान मुलांना मिथॅमोग्लोबिनामिया हा आजार होतो. शरीर निळे पडते, आॅक्सीजन कमी होतो, त्यामुळे रुग्ण मुलाला कृत्रिम आॅक्सीजन लावावा लागतो तर मोठ्या माणसांना ब्लडप्रेशर, पोटदुखी, पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्य विभागाने भीती व्यक्त केली आहे.शिवाय, तसे संबंधित ग्रामपंचायतींना सूचना केल्या असून, पाणी स्त्रोताचे शुद्धिकरण करावे, असे पत्र आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना पाठविले आहे. फ्लोराईडचे प्रमाण जिल्ह्यात कमी असले तरी रेणापूर तालुक्यातील एका जलस्त्रोत नव्याने वाढला आहे. अहमदपूर तालुक्यात पूर्वी आठ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी आढळले होते. आता सात ठिकाणी फ्लोराईड आढळले आहे. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे हाडे व दात ठिसूळ होणे, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे, पोटाचा विकार, लिव्हर, किडनी, हृदय कोशिकेवर परिणाम होणे आदी आजार उद्भवतात. या पद्धतीचे रुग्ण अहमदपूर तालुक्यात आढळले नसले तरी शेजारच्या नांदेड जिल्ह्यात असे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या सातही ठिकाणचे पाणी पिण्यास वापरू नये, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, पाण्यात नायट्रेट आणि फ्लोराईडचे प्रमाण येत असल्यामुळे सर्वच पाणी तपासण्याची मोहीम आरोग्य विभागामार्फत राबविली जाईल.वातावरणातील नायट्रोजन वायूचा संपर्क जमिनीवरील माती व पाण्यासोबत आल्याने नायट्रेटचे मिश्रण पाण्यात होते. आकाशातील वीज निर्मितीमुळेही नायट्रोजन आॅक्साईड तयार होतो. जमीन पाणी व वृक्षाद्वारे नायट्रेट निर्मिती होत असून, रासायनिक खतांचा अति वापर झाल्यानेही नायट्रेटचे प्रमाण वाढले आहे. जनावरांचे मलमूत्र, घरातील व कारखान्यांतील सांडपाण्याचा जमिनीवर होणारा निचरा हे नायट्रेटचे प्रमाण वाढण्याचे कारण आहे, अशी माहिती जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. सुभाष मद्रेवार यांनी सांगितले. फ्लोराईडयुक्त पाण्यामुळे दात आणि हाडे ठिसूळ होतात. दात, हाडांचा फ्लोरिसिस असे या आजाराचे नाव आहे. माणसाची वाढही खुंटते. हिमोग्लोबीनचे प्रमाण व पोटाचा विकार उद्भवतो. यामुळे फ्लोराईडयुक्त पाणी घातक आहे. दात ठिसूळच नाही तर पिवळे पडतात, असे दंतरोग तज्ज्ञ डॉ. धनराज शितोळे यांनी सांगितले.