शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ग्रामीण भागातील नववी ते

By | Updated: November 22, 2020 09:01 IST

\Sजिल्हाधिकारी सुनील चव्हाण : जिल्हा प्रशासनाचा निर्णय, शाळाच शिक्षणाचे उत्तम माध्यम -- औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमे, साहित्याची उणीव ...

\Sजिल्हाधिकारी सुनील चव्हाण : जिल्हा प्रशासनाचा निर्णय, शाळाच शिक्षणाचे उत्तम माध्यम

--

औरंगाबाद : खेड्यात ऑनलाईन माध्यमे, साहित्याची उणीव जाणवते. नेटवर्कच्याही समस्या असून, शाळाच ग्रामीण भागात शिक्षणाचे उत्तम माध्यम आहे. कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना जिल्ह्यात एकही कंटेन्मेंट झोन नाही. चांगल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे रुग्ण बरे होण्याचा दर अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ८२४ शाळांत नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शासकीय निवासस्थानी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत उपरोक्त निर्णय जाहीर केला. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद सीईओ मंगेश गोंदावले, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जायस्वाल, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याची जबाबदारी शासनाने सोपविली होती. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी, काळजी घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरी आणि ग्रामीण परिस्थिती व तेथील समस्या वेगळ्या आहेत. ग्रामीणमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटत असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९६ टक्के आहे. शहरापेक्षा मृत्यूदरही कमी आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या साधनांची कमतरता आणि नेटवर्कच्या समस्येमुळे शिक्षणाची घडी बसवण्यासाठी शाळा सुरू होणे गरजेचे आहे. त्यासाठी ७१३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केली जात आहे. शनिवारी दुपारपर्यंत साडेचार हजार शिक्षकांची तपासणी झालेली असून, त्यातून ९ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. हे प्रमाण चिंता करण्यासारखे नाही. सोमवारपर्यंत सर्व तपासण्या पूर्ण होतील. शिक्षकांना आरटीपीसीआर तपासणीशिवाय शाळेत जाता येणार नाही, तर पालकांच्या संमतीनेच विद्यार्थ्यांना शाळेत घेतले जाईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. ग्रामीणमध्ये तपासणी झालेल्या शिक्षकांची १०० टक्के उपस्थिती, तर शहरात ५० टक्के शिक्षकांची सोमवारपासून उपस्थिती असेल, असे शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण म्हणाले.

---

शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे, पण जीवन अमूल्य

---

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांचे जीवन अमूल्य आहे. बाधितांच्या संख्येतील वृद्धी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता याची पडताळणी १० डिसेंबरला करू. शाळा सोमवारपासून सुरू होतील; पण विद्यार्थ्यांना ३ जानेवारीपर्यंत शाळेत न येण्याचे सांगण्यात आल्याचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

---

जिल्हाधिकारी व आयुक्तांमध्ये समन्वयाचा अभाव

---

मनपा आयुक्तांनी शनिवारी आधी शाळेबाबतची मनपाची भूमिका जाहीर केली. त्यानंतर तातडीची पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर करताना सीईओ सोबत होते, तर मनपा आयुक्त पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही क्षणापूर्वी तिथे पोहोचले. सर्व काही आलबेल असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भासवले. मात्र, शहरी व ग्रामीणवरून अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव यातून दिसून आला.