शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी नऊ पथके

By admin | Updated: May 14, 2017 00:40 IST

जालना : खतांचा काळा बाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी बियाणे,रासायनिक खतांची जुळवाजुळव करत आहे.पेरणीच्या तोंडावर बियाणे तसेच खतांचा काळा बाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक या प्रमाणे नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके वेळेत तसेच दर्जेदार मिळावीत म्हणून या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. भरारी पथक शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच अचानक जाऊन कृषी केंद्र तसेच विक्रेत्यांची तपासणी करणार आहे. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षामार्फत कापूस, सोयाबीन, कडधान्य, बियाणांच्या वितरणावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांना अप्रमाणित बियाणांची विक्री होऊ नये म्हणून विशेष लक्ष केंद्रीत असणार आहे. बियाणे निरीक्षकांमार्फत बियाणांचे नुमने काढून शेतकऱ्यांनी माहिती देण्यात येणार असल्याचे कृषी विभााकडून सांगण्यात आले. पथकांसोबत गुणवत्ता नियंत्रण अभियानही राबविण्यात येणार आहे. त्यातंर्गत जिल्ह्यस्तरावर सहा, उपविभागस्तरावर ४ तर तालुकास्तरावर एकूण १६ असे २६ गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध होण्यासारी निरीक्षकांन नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बियाणांचे ५१२, खतांचे ३१९ व किटकनाशकांचे १२७ नमुने काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना काही शंका अथवा काही तक्रार आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. खरीप हंगामात किटकनाशके, खतांच्या व बियाणांच्या उत्पादन स्थळांची तपासणीही करण्यात येणार आहे.