शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी नऊ पथके

By admin | Updated: May 14, 2017 00:40 IST

जालना : खतांचा काळा बाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी बियाणे,रासायनिक खतांची जुळवाजुळव करत आहे.पेरणीच्या तोंडावर बियाणे तसेच खतांचा काळा बाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक या प्रमाणे नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके वेळेत तसेच दर्जेदार मिळावीत म्हणून या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. भरारी पथक शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच अचानक जाऊन कृषी केंद्र तसेच विक्रेत्यांची तपासणी करणार आहे. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षामार्फत कापूस, सोयाबीन, कडधान्य, बियाणांच्या वितरणावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांना अप्रमाणित बियाणांची विक्री होऊ नये म्हणून विशेष लक्ष केंद्रीत असणार आहे. बियाणे निरीक्षकांमार्फत बियाणांचे नुमने काढून शेतकऱ्यांनी माहिती देण्यात येणार असल्याचे कृषी विभााकडून सांगण्यात आले. पथकांसोबत गुणवत्ता नियंत्रण अभियानही राबविण्यात येणार आहे. त्यातंर्गत जिल्ह्यस्तरावर सहा, उपविभागस्तरावर ४ तर तालुकास्तरावर एकूण १६ असे २६ गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध होण्यासारी निरीक्षकांन नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बियाणांचे ५१२, खतांचे ३१९ व किटकनाशकांचे १२७ नमुने काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना काही शंका अथवा काही तक्रार आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. खरीप हंगामात किटकनाशके, खतांच्या व बियाणांच्या उत्पादन स्थळांची तपासणीही करण्यात येणार आहे.