शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी नऊ पथके

By admin | Updated: May 14, 2017 00:40 IST

जालना : खतांचा काळा बाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकरी बियाणे,रासायनिक खतांची जुळवाजुळव करत आहे.पेरणीच्या तोंडावर बियाणे तसेच खतांचा काळा बाजार होऊ नये म्हणून कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर एक व प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक या प्रमाणे नऊ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके वेळेत तसेच दर्जेदार मिळावीत म्हणून या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. भरारी पथक शेतकऱ्यांच्या तक्रारी तसेच अचानक जाऊन कृषी केंद्र तसेच विक्रेत्यांची तपासणी करणार आहे. जिल्हास्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कक्षामार्फत कापूस, सोयाबीन, कडधान्य, बियाणांच्या वितरणावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणार आहे. शेतकऱ्यांना अप्रमाणित बियाणांची विक्री होऊ नये म्हणून विशेष लक्ष केंद्रीत असणार आहे. बियाणे निरीक्षकांमार्फत बियाणांचे नुमने काढून शेतकऱ्यांनी माहिती देण्यात येणार असल्याचे कृषी विभााकडून सांगण्यात आले. पथकांसोबत गुणवत्ता नियंत्रण अभियानही राबविण्यात येणार आहे. त्यातंर्गत जिल्ह्यस्तरावर सहा, उपविभागस्तरावर ४ तर तालुकास्तरावर एकूण १६ असे २६ गुणनियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार खते, बियाणे, किटकनाशके उपलब्ध होण्यासारी निरीक्षकांन नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बियाणांचे ५१२, खतांचे ३१९ व किटकनाशकांचे १२७ नमुने काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना काही शंका अथवा काही तक्रार आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. खरीप हंगामात किटकनाशके, खतांच्या व बियाणांच्या उत्पादन स्थळांची तपासणीही करण्यात येणार आहे.