शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत तब्बल नऊ गरोदर मातांचा मृत्यू

By admin | Updated: September 20, 2016 00:22 IST

औरंगाबाद : माता मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत.

औरंगाबाद : माता मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरातच मागील पाच महिन्यांमध्ये नऊ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील वर्षी एकूण १३ मातांचा मृत्यू झाला होता. महापालिका हद्दीतील या आकडेवारीने शासन योजना फक्त कागदावरच सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.महापालिकेत सोमवारी सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी साथरोगांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.शहरी भागातील गरोदर मातांची काळजी मनपातर्फे कशा पद्धतीने घेण्यात येते याचा तपशील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितला. महापालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रांवर दर महिन्याच्या ९ तारखेला महिलांची मोफत तपासणी करण्यात येते. त्यांना आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात येतात. एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांत ९ मातांचा मृत्यू झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यामध्ये हृदयविकार, थायरॉईड आदी आजारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एका महिलेची प्रसूती घरीच झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शहरात असंख्य रुग्णालये, केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू असताना महिलांचा मृत्यू होतोच कसा, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली कातडी वाचविण्यासाठी आम्ही माता मृत्यूच्या केसेस तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीसमोर ठेवतो. समितीच्या अहवालानुसार आणखी त्यात सुधारणा करण्यात येते. घरोघरी जाऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी गर्भवती महिलांची नोंद, माहिती ठेवणे, त्यांना वेळोवेळी औषधोपचार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करतात, असे यावेळी सांगण्यात आले.