शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत तब्बल नऊ गरोदर मातांचा मृत्यू

By admin | Updated: September 20, 2016 00:22 IST

औरंगाबाद : माता मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत.

औरंगाबाद : माता मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरातच मागील पाच महिन्यांमध्ये नऊ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील वर्षी एकूण १३ मातांचा मृत्यू झाला होता. महापालिका हद्दीतील या आकडेवारीने शासन योजना फक्त कागदावरच सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.महापालिकेत सोमवारी सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी साथरोगांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.शहरी भागातील गरोदर मातांची काळजी मनपातर्फे कशा पद्धतीने घेण्यात येते याचा तपशील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितला. महापालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रांवर दर महिन्याच्या ९ तारखेला महिलांची मोफत तपासणी करण्यात येते. त्यांना आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात येतात. एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांत ९ मातांचा मृत्यू झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यामध्ये हृदयविकार, थायरॉईड आदी आजारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एका महिलेची प्रसूती घरीच झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शहरात असंख्य रुग्णालये, केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू असताना महिलांचा मृत्यू होतोच कसा, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली कातडी वाचविण्यासाठी आम्ही माता मृत्यूच्या केसेस तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीसमोर ठेवतो. समितीच्या अहवालानुसार आणखी त्यात सुधारणा करण्यात येते. घरोघरी जाऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी गर्भवती महिलांची नोंद, माहिती ठेवणे, त्यांना वेळोवेळी औषधोपचार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करतात, असे यावेळी सांगण्यात आले.