शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पाच महिन्यांत तब्बल नऊ गरोदर मातांचा मृत्यू

By admin | Updated: September 20, 2016 00:22 IST

औरंगाबाद : माता मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत.

औरंगाबाद : माता मृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मागील काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात येत आहेत. औरंगाबाद शहरातच मागील पाच महिन्यांमध्ये नऊ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील वर्षी एकूण १३ मातांचा मृत्यू झाला होता. महापालिका हद्दीतील या आकडेवारीने शासन योजना फक्त कागदावरच सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.महापालिकेत सोमवारी सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांनी साथरोगांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.शहरी भागातील गरोदर मातांची काळजी मनपातर्फे कशा पद्धतीने घेण्यात येते याचा तपशील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितला. महापालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रांवर दर महिन्याच्या ९ तारखेला महिलांची मोफत तपासणी करण्यात येते. त्यांना आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या देण्यात येतात. एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यांत ९ मातांचा मृत्यू झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. यामध्ये हृदयविकार, थायरॉईड आदी आजारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. एका महिलेची प्रसूती घरीच झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. शहरात असंख्य रुग्णालये, केंद्र आणि राज्य शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजना सुरू असताना महिलांचा मृत्यू होतोच कसा, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांना पडला. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपली कातडी वाचविण्यासाठी आम्ही माता मृत्यूच्या केसेस तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीसमोर ठेवतो. समितीच्या अहवालानुसार आणखी त्यात सुधारणा करण्यात येते. घरोघरी जाऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी गर्भवती महिलांची नोंद, माहिती ठेवणे, त्यांना वेळोवेळी औषधोपचार मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करतात, असे यावेळी सांगण्यात आले.