शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जालना शहरात होणार नऊ नवीन जलकुंभ

By admin | Updated: May 14, 2017 23:47 IST

जालना : शहराची वाढती लोकसंख्या तसेच नवीन जलवाहिनी झाल्यावर संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभांचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराची वाढती लोकसंख्या तसेच नवीन जलवाहिनी झाल्यावर संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन जलकुंभांचे बांधकाम येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जलवाहिनीच्या कामासोबतच ही कामे सुरू करण्यात आली आहे. शहरात जुने १३ जलकंभ आहेत. पैकी एक मुख्य टाकी व अन्य बारा उपविभागाचे कुंभ आहे. पैकी दोन कुंभ नादुरूस्त आहे. हे जलकुंभ कमी पडत असल्याने पालिकेकडून ९ नवीन जलकुंभ बांधण्यात येत आहेत. नऊ कुंभांपैकी एक मुख्य टाकी व अन्य आठ टाक्या संबंधित विभागाच्या असतील. इंदेवाडी येथे मुख्य पाण्याची टाकी असणार आहे. जलकुंभ उभारण्याबाबतची तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत. जागांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे.शहरात पाणीपुरवठ्याचे बारा झोन आहेत. त्यासाठी १३ कुंभांतून पाणीपुरवठा सुरू आहे.गत चार ते पाच वर्षांत लोकसंख्या तीन लाखांवर पोहचली आहे. जायकवाडी येथून पाण्याची आवक जास्त असली तरी पाणी साठा करण्यासाठी जलकुंभ कमी पडत होते.आलेल्या पाण्याचा साठा व्हावा म्हणून नऊ जलकुंभ नव्याने बांधण्यात येत आहेत. यापैकी जुन्या बाजार समिती परिसरातील जलकुंभाचा इलेव्हेटेड सर्व्हीस रिझर्व्ह वायर (ईएसआरडब्ल्यू) पूर्ण झाले आहे. नागरी परिसरात उंच टाक्या होणार असल्याने याबाबतचे तांत्रिक निकष पूर्ण करूनच या टाक्या उभारण्यात येणार आहे. विशेषत: नवीन वसाहतींना या जलकुंभाचा फायदा होणार असल्याचे मुख्याधिकारी खांडेकर यांनी सांगितले.