शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

नऊ महिन्यांपासून १२ शाळा उघड्यावर

By admin | Updated: February 16, 2015 00:53 IST

आष्टी : जून महिन्यातील अवकाळी पावसासह झालेल्या चक्रीवादळच्या तडाख्याने तालुक्यातील १२ शाळांची पत्रे उडाल्याने छत राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना उघड्यावरच

आष्टी : जून महिन्यातील अवकाळी पावसासह झालेल्या चक्रीवादळच्या तडाख्याने तालुक्यातील १२ शाळांची पत्रे उडाल्याने छत राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. याकडे शिक्षण विभागाला लक्ष द्यायला वेळ नाही. आणखी किती दिवस ही चिमुरडी उघड्यावर ज्ञानार्जनाचे धडे गिरवणार आहेत असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. १५ दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास शिक्षण विभाग बीड येथे त्यांच्या दालनात शाळा भरवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव खाकाळ यांनी सांगितले.आष्टी शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कडा साखर कारखाना, अरणविहरा, कासारी, धनवडे गोठे, लोणी सय्यदमीर, बळेवाडी, आष्टी माध्यमिक जि. प. शाळा, चिंचपूर, गणगेवाडी, तवलवाडी, कारखेल, आष्टी नं. एक या जि. प. शाळांचे पत्रे जूनमधील झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात उडून गेल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करण्याची वेळ आली. या शाळांची दुरूस्ती व्हावी यासाठी या शाळांनी अहवाल गटशिक्षण कार्यालयात दाखल करून नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील उघड्या शाळांवर छत पडायला तयार नसल्याने उघड्यावरच्या शिक्षणाने विद्यार्थ्यांचे मन रमत नाही. आम्ही अहवाला पलिकडे काहीच करू शकत नसल्याचे शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तालुक्यातील शिक्षण विभागाने ही गंभीर बाब त्वरीत मार्गी लावावी, नसता गटशिक्षण कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे बहुजन विकास मोर्चाचे आष्टी तालुका उपाध्यक्ष प्रा. संजय खंडागळे, अशोक खाकाळ यांनी सांगितले.आष्टीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके म्हणाले, चक्रीवादळातील पत्रे उडालेल्या शाळांची दुरूस्ती व्हावी यासाठी शिक्षणाधिकारी यांना अहवाल पाठवला आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.