शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नऊ महिन्यांपासून १२ शाळा उघड्यावर

By admin | Updated: February 16, 2015 00:53 IST

आष्टी : जून महिन्यातील अवकाळी पावसासह झालेल्या चक्रीवादळच्या तडाख्याने तालुक्यातील १२ शाळांची पत्रे उडाल्याने छत राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना उघड्यावरच

आष्टी : जून महिन्यातील अवकाळी पावसासह झालेल्या चक्रीवादळच्या तडाख्याने तालुक्यातील १२ शाळांची पत्रे उडाल्याने छत राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करण्याची वेळ आली आहे. याकडे शिक्षण विभागाला लक्ष द्यायला वेळ नाही. आणखी किती दिवस ही चिमुरडी उघड्यावर ज्ञानार्जनाचे धडे गिरवणार आहेत असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. १५ दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास शिक्षण विभाग बीड येथे त्यांच्या दालनात शाळा भरवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुखदेव खाकाळ यांनी सांगितले.आष्टी शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कडा साखर कारखाना, अरणविहरा, कासारी, धनवडे गोठे, लोणी सय्यदमीर, बळेवाडी, आष्टी माध्यमिक जि. प. शाळा, चिंचपूर, गणगेवाडी, तवलवाडी, कारखेल, आष्टी नं. एक या जि. प. शाळांचे पत्रे जूनमधील झालेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात उडून गेल्याने विद्यार्थ्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करण्याची वेळ आली. या शाळांची दुरूस्ती व्हावी यासाठी या शाळांनी अहवाल गटशिक्षण कार्यालयात दाखल करून नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील उघड्या शाळांवर छत पडायला तयार नसल्याने उघड्यावरच्या शिक्षणाने विद्यार्थ्यांचे मन रमत नाही. आम्ही अहवाला पलिकडे काहीच करू शकत नसल्याचे शिक्षकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तालुक्यातील शिक्षण विभागाने ही गंभीर बाब त्वरीत मार्गी लावावी, नसता गटशिक्षण कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे बहुजन विकास मोर्चाचे आष्टी तालुका उपाध्यक्ष प्रा. संजय खंडागळे, अशोक खाकाळ यांनी सांगितले.आष्टीचे गटशिक्षणाधिकारी श्रीराम कनाके म्हणाले, चक्रीवादळातील पत्रे उडालेल्या शाळांची दुरूस्ती व्हावी यासाठी शिक्षणाधिकारी यांना अहवाल पाठवला आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.