शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा नवा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.राज्य शासनाने शेतकºयांसाठी विविध निकष घालून कर्जमाफीची घोषणा केली. त्याला अडीच महिने उलटूनही अद्याप लाभ मिळालाच नसून सदर योजनेत रोजच नवनव्या नियम व अटींची भर पडू लागली असून शासनाने घालून दिलेल्या विविध बाबींची पूर्तता करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. सेतू केंद्रावर कर्ज घोषणापत्र आॅनलाईन दाखल करण्याची अट शासनाकडून टाकल्यामुळे सेतू केंद्रावर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच वारंवार इंटरनेट कनेक्टीव्हिटी खंडित होत असून वेबसाईड हँग होत असल्याने व्यत्यय निर्माण होत आहे. दिवसभर रांगेत उभे टाकुनही अर्ज दाखल होत नसल्याने शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज घोषणापत्र दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते पुस्तक असणे गरजेचे केले असल्याने शेतकºयांना यासाठी पायपीट सहन करावी लागत आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून निर्माण होणाºया विविध अडचणीमुळे शेतकºयांची भलतीच तारांबळ उडत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी एकीकडे मोठा गोंधळ सुरू असताना आता बँकेमध्येसुद्धा कर्जमाफीच्या फॉर्मसह आॅनलाईन अर्ज दाखल केल्याची पावती, कर्ज खात्याची व बचत खात्याचे पासबूक पत्र, आधार कार्ड, सातबारा, होल्डींग, मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र दाखल करण्याचा नवा फतवा शासनाने काढला आहे. गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत १३ सप्टेंबर रोजी दुपारी बँकेत अर्ज आणि कागदपत्रे दाखल करण्याचा फलक लावला असून त्यावर १६ सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याचे नमूद आहे. केवळ तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. शासनाकडून लादण्यात येणाºया नवनव्या निर्णय व अटीमुळे पुन्हा अडचण निर्माण झाल्याने शासनाकडून घोषणा करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान की अवमान योजना ? असा सवाल व्यक्त करीत शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.याबाबत बँक शाखाधिकारी मनीष कुमार झा यांना विचारले असता ते म्हणाले, वरिष्ठांकडून बँकेमध्ये कर्ज माफीचे अर्ज आणि कागदपत्रे दाखल करून घेण्यास सांगण्यात आले आहे. यावरून कर्जमाफीसाठी यादी शासनाकडे सादर करावयाची असून याद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मुदतीत अर्ज कागदपत्रे दाखल करण्याचे अवाहन त्यांनी केले.