शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कर्जमाफीसाठी पुन्हा एकदा नवा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:45 IST

कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज दाखल करताना इंटरनेट आणि वेबसाईटच्या व्यत्ययामुळे मोठा गोंधळ निर्माण होत आहे. आता पुन्हा कर्जमाफीच्या अर्जासह अन्य कागदपत्रे बँकेत दाखल करण्याचा नवा फतवा काढला असून त्यालाही अवघ्या तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.राज्य शासनाने शेतकºयांसाठी विविध निकष घालून कर्जमाफीची घोषणा केली. त्याला अडीच महिने उलटूनही अद्याप लाभ मिळालाच नसून सदर योजनेत रोजच नवनव्या नियम व अटींची भर पडू लागली असून शासनाने घालून दिलेल्या विविध बाबींची पूर्तता करण्यातच शेतकरी हैराण झाला आहे. सेतू केंद्रावर कर्ज घोषणापत्र आॅनलाईन दाखल करण्याची अट शासनाकडून टाकल्यामुळे सेतू केंद्रावर मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यातच वारंवार इंटरनेट कनेक्टीव्हिटी खंडित होत असून वेबसाईड हँग होत असल्याने व्यत्यय निर्माण होत आहे. दिवसभर रांगेत उभे टाकुनही अर्ज दाखल होत नसल्याने शेतकºयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अर्ज घोषणापत्र दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक खाते पुस्तक असणे गरजेचे केले असल्याने शेतकºयांना यासाठी पायपीट सहन करावी लागत आहे. आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत असून निर्माण होणाºया विविध अडचणीमुळे शेतकºयांची भलतीच तारांबळ उडत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी एकीकडे मोठा गोंधळ सुरू असताना आता बँकेमध्येसुद्धा कर्जमाफीच्या फॉर्मसह आॅनलाईन अर्ज दाखल केल्याची पावती, कर्ज खात्याची व बचत खात्याचे पासबूक पत्र, आधार कार्ड, सातबारा, होल्डींग, मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र दाखल करण्याचा नवा फतवा शासनाने काढला आहे. गोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत १३ सप्टेंबर रोजी दुपारी बँकेत अर्ज आणि कागदपत्रे दाखल करण्याचा फलक लावला असून त्यावर १६ सप्टेंबरपर्यंत मुदत असल्याचे नमूद आहे. केवळ तीनच दिवसांची मुदत दिल्याने शेतकरी चक्रावून गेला आहे. शासनाकडून लादण्यात येणाºया नवनव्या निर्णय व अटीमुळे पुन्हा अडचण निर्माण झाल्याने शासनाकडून घोषणा करण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान की अवमान योजना ? असा सवाल व्यक्त करीत शेतकºयांमधून संताप व्यक्त होत आहे.याबाबत बँक शाखाधिकारी मनीष कुमार झा यांना विचारले असता ते म्हणाले, वरिष्ठांकडून बँकेमध्ये कर्ज माफीचे अर्ज आणि कागदपत्रे दाखल करून घेण्यास सांगण्यात आले आहे. यावरून कर्जमाफीसाठी यादी शासनाकडे सादर करावयाची असून याद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. मुदतीत अर्ज कागदपत्रे दाखल करण्याचे अवाहन त्यांनी केले.