शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नव्या साहित्यप्रवाहांची चिकित्सा समीक्षेने व्हावी

By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST

नांदेड: मराठीत निर्माण होणाऱ्या सर्व वाङ्मयीन प्रवाहाची चिकित्सा मराठी समीक्षेनं करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ़ गंगाधर पानतावणे यांनी केले़

नांदेड: मराठीत निर्माण होणाऱ्या सर्व वाङ्मयीन प्रवाहाची चिकित्सा मराठी समीक्षेनं करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ़ गंगाधर पानतावणे यांनी केले़साहित्य अकादमी व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भाषा संकुलाच्या वतीने आयोजित ‘स्वातंत्र्योत्तर मराठी समीक्षा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़ ज्येष्ठ समीक्षक डॉ़ दिगंबर पाध्ये, कुलगुरु डॉ़ पंडित विद्यासागर, साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने, संचालक डॉ़ रमेश ढगे, समन्वयक डॉ केशव सखाराम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ पानतावणे म्हणाले, १९६० नंतर मराठी साहित्यामध्ये जे वाङ्मयीन प्रवाह आले ते सर्व जीवनाच्या परिवर्तनाची मागणी करणारे होते़ जीवनवास्तवाशी त्याचा संबंध होता़ मात्र त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही़ रा़ ग़ जाधव, भालचंद्र फडके यासारख्या साठोत्तरी समीक्षकांनी मूलभूत चर्चा केली असली तरी इतरांनी फारसा आग्रह धरला नाही़ आजचे मराठी समीक्षक पान्हा चोरणारे आहेत़ समीक्षकांकडे स्वागतशीलवृत्ती असायला हवी़ जीवनानुभवांचे नवे पैलू मांडणाऱ्या साहित्यापर्यंत समीक्षकांनी जायला हवे़ उत्तम आणि अभिजात साहित्याची दखल समीक्षेनं घेतली तर स्वातंत्र्योत्तर मराठी समीक्षा एक मानदंड निर्माण करु शकेल़ मराठीतील प्रसिद्ध समीक्षक डॉ़ दिगंबर पाध्ये म्हणाले, समीक्षा हा साहित्योपजीवी व्यवहार आहे़ प्रत्येक काळातील साहित्याला त्या-त्या काळाचा संदर्भ असतो़ १९७५ नंतर समीक्षेत एकामागून एक सिद्धांत मराठीत आले़ नवे पारिभाषिक शब्द आले़ त्यामुळे समीक्षा समृद्ध झाली़ ब्रिटिश राज्यसत्तेशी आणि आधुनिकतेशी आपला संबंध आल्यानंतर मराठी समीक्षेचा उदय झाला़ पूर्वी केवळ धार्मिक साहित्याला प्रतिष्ठा होती़ मात्र समीक्षेनं वाचकांनी काय वाचावे? हे समजावून सांगितले़ स्वरुपलक्ष्मी समीक्षा लोप पावतेय़ त्यामुळे आजची मराठी समीक्षा क्रियाशील असल्याचे खऱ्या अर्थाने म्हणता येत नाही़ कुलगुरु डॉ़ विद्यासागर म्हणाले, आज भाषेचा गांभीर्याने विचार केला जात नाही़ भाषा, साहित्याचे आकलन होण्यासाठी चर्चासत्र उपयुक्त माध्यम ठरु शकेल़ समीक्षक हा एकांगी असू नये तर त्याने कसा आणि माणूस या दोन्ही गोष्टी समजून घ्यायला हव्यात़ दिवसभर चाललेल्या चर्चासत्रात डॉ़ तु़ श़ कुलकर्णी आणि डॉ़ एल़ एस देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ़ सतीश बडवे, नीळकंठ कदम, डॉ़ अरुणा दुभाषी, डॉ़ आशुतोष पाटील, डॉ़ रामचंद्र काळुंखे यांनी अभ्यासपूर्ण निबंध सादर केले़ प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी चर्चासत्राचा समारोप झाला़ नीळकंठ कदम, श्रीधर नांदेडकर, केशव देशमुख, पी़ विठ्ठल, पृथ्वीराज तौर या निमंत्रित कवींचे कविसंमेलन झाले़ संचालक डॉ़ रमेश ढगे यांनी आभार मानले़ यावेळी अनेकांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)