शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नवीन औरंगाबाद शहर गणेश महासंघ ‘श्रीं’ ची उत्साहात स्थापना

By admin | Updated: September 6, 2016 01:06 IST

औरंगाबाद : नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाच्या ‘श्री’ गणेशमूर्तीची सोमवारी सायंकाळी महाआरतीने विधीवत आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली.

औरंगाबाद : नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाच्या ‘श्री’ गणेशमूर्तीची सोमवारी सायंकाळी महाआरतीने विधीवत आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली. याप्रसंगी १२ वर्षांत महासंघाने केलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, डॉ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड यांच्या उपस्थितीत श्रींची आरती करण्यात आली. यावेळी माजी आ.कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष माजी आ.नामदेव पवार, उद्योगपती श्रीकांत शेळके, जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, मनपा गटनेते राजू वैद्य, गटनेते भाऊसाहेब जगताप, महासंघाचे अध्यक्ष पंजाबराव तौर, संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे, कार्याध्यक्ष नसीर पटेल, स्वागताध्यक्ष मनोज जैस्वाल, सचिव बाळासाहेब हरबक, उद्धव सावरे, बाबूराव कवसकर, पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, बी. बी. शिंदे, आतिश पितळे, प्रभाकर पवार, राजाराम पवार, कल्याण कावरे, नीलेश सुरासे यांच्यासह शेकडो गणेशभक्तांची उपस्थिती होती. आ. झांबड यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यासाठी गणरायाला साकडे घातले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, महासंघाने शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवावी. महासंघाने गेल्या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केल्याचा उल्लेख केला. आ.शिरसाट म्हणाले, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनपाला दोष देण्यापेक्षा विधानसभा अध्यक्षांनी सचिव, अर्थमंत्र्यांकडून रस्त्यांसाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आ.सावे म्हणाले, श्रींच्या विसर्जन मिरवणुकीचे मार्ग चांगले होतील. काही रस्त्यांची कामे गटार योजनेमुळे उशिरा होत आहेत. महासंघाचे काम उल्लेखनीयलोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, दरवर्षी हा महासंघ वेगळे काम करतो. शेतकऱ्यांना मदत, विहीर स्वच्छ करताना दगावलेल्या युवकांच्या कुटुंबांना मदतीसारखे व भजन, कीर्तन, जनजागृतीसारखी उल्लेखनीय कामे महासंघाने केली आहेत. १२ वर्षांपूर्वी हा महासंघ सुरू केला. नवीन मिरवणूक मार्ग मिळाला. रस्त्यांवरील खड्डे सर्वांना दिसतात. परंतु अलीकडे कुणाच्याही लक्षात न येण्यासाठी ‘पॉटहोल’ हा शब्द वापरला जात आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मंडळाने पुढाकार घ्यावाविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, प्रत्येक गणेश मंडळाने ऐपतीनुसार १ हजार क्युबिक मीटर नदी, नाल्यांचे खोलीकरण करावे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना रुजविण्यासाठी मंडळांनी पुढे यावे. यासाठी २५ हजार रुपये खर्च येईल. यंदा औरंगाबादेत परतीचा पाऊस पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.