शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नवीन औरंगाबाद शहर गणेश महासंघ ‘श्रीं’ ची उत्साहात स्थापना

By admin | Updated: September 6, 2016 01:06 IST

औरंगाबाद : नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाच्या ‘श्री’ गणेशमूर्तीची सोमवारी सायंकाळी महाआरतीने विधीवत आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली.

औरंगाबाद : नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाच्या ‘श्री’ गणेशमूर्तीची सोमवारी सायंकाळी महाआरतीने विधीवत आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली. याप्रसंगी १२ वर्षांत महासंघाने केलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, डॉ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड यांच्या उपस्थितीत श्रींची आरती करण्यात आली. यावेळी माजी आ.कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष माजी आ.नामदेव पवार, उद्योगपती श्रीकांत शेळके, जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, मनपा गटनेते राजू वैद्य, गटनेते भाऊसाहेब जगताप, महासंघाचे अध्यक्ष पंजाबराव तौर, संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे, कार्याध्यक्ष नसीर पटेल, स्वागताध्यक्ष मनोज जैस्वाल, सचिव बाळासाहेब हरबक, उद्धव सावरे, बाबूराव कवसकर, पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, बी. बी. शिंदे, आतिश पितळे, प्रभाकर पवार, राजाराम पवार, कल्याण कावरे, नीलेश सुरासे यांच्यासह शेकडो गणेशभक्तांची उपस्थिती होती. आ. झांबड यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यासाठी गणरायाला साकडे घातले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, महासंघाने शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवावी. महासंघाने गेल्या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केल्याचा उल्लेख केला. आ.शिरसाट म्हणाले, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनपाला दोष देण्यापेक्षा विधानसभा अध्यक्षांनी सचिव, अर्थमंत्र्यांकडून रस्त्यांसाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आ.सावे म्हणाले, श्रींच्या विसर्जन मिरवणुकीचे मार्ग चांगले होतील. काही रस्त्यांची कामे गटार योजनेमुळे उशिरा होत आहेत. महासंघाचे काम उल्लेखनीयलोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, दरवर्षी हा महासंघ वेगळे काम करतो. शेतकऱ्यांना मदत, विहीर स्वच्छ करताना दगावलेल्या युवकांच्या कुटुंबांना मदतीसारखे व भजन, कीर्तन, जनजागृतीसारखी उल्लेखनीय कामे महासंघाने केली आहेत. १२ वर्षांपूर्वी हा महासंघ सुरू केला. नवीन मिरवणूक मार्ग मिळाला. रस्त्यांवरील खड्डे सर्वांना दिसतात. परंतु अलीकडे कुणाच्याही लक्षात न येण्यासाठी ‘पॉटहोल’ हा शब्द वापरला जात आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मंडळाने पुढाकार घ्यावाविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, प्रत्येक गणेश मंडळाने ऐपतीनुसार १ हजार क्युबिक मीटर नदी, नाल्यांचे खोलीकरण करावे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना रुजविण्यासाठी मंडळांनी पुढे यावे. यासाठी २५ हजार रुपये खर्च येईल. यंदा औरंगाबादेत परतीचा पाऊस पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.