शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

नवीन औरंगाबाद शहर गणेश महासंघ ‘श्रीं’ ची उत्साहात स्थापना

By admin | Updated: September 6, 2016 01:06 IST

औरंगाबाद : नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाच्या ‘श्री’ गणेशमूर्तीची सोमवारी सायंकाळी महाआरतीने विधीवत आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली.

औरंगाबाद : नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघाच्या ‘श्री’ गणेशमूर्तीची सोमवारी सायंकाळी महाआरतीने विधीवत आणि मंगलमय वातावरणात स्थापना करण्यात आली. याप्रसंगी १२ वर्षांत महासंघाने केलेल्या सामाजिक उपक्रमांबाबत मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, डॉ. कल्याण काळे, आ. सुभाष झांबड यांच्या उपस्थितीत श्रींची आरती करण्यात आली. यावेळी माजी आ.कल्याण काळे, काँग्रेस शहराध्यक्ष माजी आ.नामदेव पवार, उद्योगपती श्रीकांत शेळके, जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, मनपा गटनेते राजू वैद्य, गटनेते भाऊसाहेब जगताप, महासंघाचे अध्यक्ष पंजाबराव तौर, संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे, कार्याध्यक्ष नसीर पटेल, स्वागताध्यक्ष मनोज जैस्वाल, सचिव बाळासाहेब हरबक, उद्धव सावरे, बाबूराव कवसकर, पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, बी. बी. शिंदे, आतिश पितळे, प्रभाकर पवार, राजाराम पवार, कल्याण कावरे, नीलेश सुरासे यांच्यासह शेकडो गणेशभक्तांची उपस्थिती होती. आ. झांबड यांनी मराठवाडा दुष्काळमुक्त होण्यासाठी गणरायाला साकडे घातले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, महासंघाने शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवावी. महासंघाने गेल्या वर्षी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत केल्याचा उल्लेख केला. आ.शिरसाट म्हणाले, रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मनपाला दोष देण्यापेक्षा विधानसभा अध्यक्षांनी सचिव, अर्थमंत्र्यांकडून रस्त्यांसाठी निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आ.सावे म्हणाले, श्रींच्या विसर्जन मिरवणुकीचे मार्ग चांगले होतील. काही रस्त्यांची कामे गटार योजनेमुळे उशिरा होत आहेत. महासंघाचे काम उल्लेखनीयलोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा म्हणाले, दरवर्षी हा महासंघ वेगळे काम करतो. शेतकऱ्यांना मदत, विहीर स्वच्छ करताना दगावलेल्या युवकांच्या कुटुंबांना मदतीसारखे व भजन, कीर्तन, जनजागृतीसारखी उल्लेखनीय कामे महासंघाने केली आहेत. १२ वर्षांपूर्वी हा महासंघ सुरू केला. नवीन मिरवणूक मार्ग मिळाला. रस्त्यांवरील खड्डे सर्वांना दिसतात. परंतु अलीकडे कुणाच्याही लक्षात न येण्यासाठी ‘पॉटहोल’ हा शब्द वापरला जात आहे. शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मंडळाने पुढाकार घ्यावाविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, प्रत्येक गणेश मंडळाने ऐपतीनुसार १ हजार क्युबिक मीटर नदी, नाल्यांचे खोलीकरण करावे. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना रुजविण्यासाठी मंडळांनी पुढे यावे. यासाठी २५ हजार रुपये खर्च येईल. यंदा औरंगाबादेत परतीचा पाऊस पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.