शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

बायपास भूसंपादनाला तूर्तास नकार

By admin | Updated: July 19, 2014 01:21 IST

औरंगाबाद : दोन वर्षांपासून भिजत पडलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया काही प्रमाणात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद : दोन वर्षांपासून भिजत पडलेल्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया काही प्रमाणात मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. बायपासचा भाग वगळता जिल्ह्यातील उर्वरित भागात भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने आजच्या बैठकीत दाखविली. त्यानुसार वाळूज येथील एएस क्लबपासून पुढे कन्नड औट्रम घाटापर्यंत महामार्गाच्या रुंदीकरणासाठी लगेचच भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी औरंगाबाद वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र, या प्रक्रियेला अद्याप सुरुवातही झालेली नाही. दोन वर्षांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. औरंगाबाद शहरातून जात असलेला हा महामार्ग शहराबाहेरून नेण्यात येणार आहे. त्यासाठी सातारा परिसरातून बायपास प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, हा बायपास आणखी दुरून म्हणजे बिडकीन परिसरातून नेण्याची सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल आणि जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केली होती. त्याच कारणावरून गेल्या वर्षापासून ही प्रक्रिया रखडली होती.हायवे अ‍ॅथॉरिटीने वाल्मी वगळता इतर सर्व म्हणजे मनपा, सिडको, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे नाहरकत प्रमाणपत्र मिळविले. वाल्मीने मात्र जागा देण्यास अजून मंजुरी दिलेली नाही. या सर्व कारणांमुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनावर सातत्याने टीका होत होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी आज या विषयावर बैठक घेतली.बैठकीला नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीचे प्रकल्प संचालक यू. व्ही. चामरगोरे, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांची उपस्थिती होती. वाल्मीच्या जागेबाबत ठोस निर्णय झाल्यानंतर बायपाससाठीची भूसंपादन प्रक्रिया सुरू केली जाईल, त्यामुळे तूर्तास एएस क्लबपासून पुढे औट्रम घाटापर्यंत भूसंपादन होईल.काम रखडल्यामुळे खर्चात वाढसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचा बायपास ५२ किलोमीटरचा असणार आहे. त्यासाठी ५६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, काम रखडल्यामुळे गेल्या वर्षात या कामाची किंमत बरीच वाढली आहे. अजूनही या बायपासच्या भूसंपादनाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या कामाच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.