शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
4
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
5
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
6
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
7
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
8
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
9
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
10
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
11
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
12
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
13
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
14
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
15
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
16
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
17
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
18
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
19
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
20
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:50 IST

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे धास्तावलेल्या बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिवसभर धरणे आंदोलन दिले. मात्र, त्याठिकाणी एकही सक्षम अधिकारी नसल्यामुळे दिवसभर बिनापाण्याचे बसून राहावे लागल्याचा प्रकार गुरुवारी घडला.

ठळक मुद्देपवित्र पोर्टलमध्ये चुका : हजारो विद्यार्थी उपसंचालक कार्यालयापुढे ताटकळत बसले; प्रशासनाचे दुर्लक्ष

औरंगाबाद : प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसाठी पवित्र पोर्टलमार्फत आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ असल्यामुळे धास्तावलेल्या बेरोजगार शिक्षकपात्र उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयावर दिवसभर धरणे आंदोलन दिले. मात्र, त्याठिकाणी एकही सक्षम अधिकारी नसल्यामुळे दिवसभर बिनापाण्याचे बसून राहावे लागल्याचा प्रकार गुरुवारी घडला.पवित्र पोर्टलमार्फत शाळांमधील शिक्षक नोकरभरती करण्यात येत आहे. या पवित्रमध्ये मागील काही दिवसांपासून सतत तांत्रिक बिघाड होत आहे. यासाठी अनेक वेळा बेरोजगार संघटनांनी तक्रारी करूनही अर्ज दुरुस्ती झालेली नाही. अर्ज करण्यासाठी शुक्रवारी शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी ज्यांना आॅनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्या सर्व उमेदवारांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात दुरुस्तीसाठी अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अर्जातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मराठवाड्यातील नांदेड, नाशिक येथून शेकडो बेरोजगार युवकांनी औरंगाबादच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात धाव घेतली. या कार्यालयात अर्ज दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा नसल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. हजारो विद्यार्थी कार्यालयाच्या परिसरात अर्ज घेऊन आले होते. मात्र, त्यांना दिवसभर कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या बेरोजगारांनी दुपारपासून शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्या कार्यालयाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी या कार्यालयात शिक्षण उपसंचालकासह सहायक उपसंचालक इतर अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे बेरोजगारांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. रात्री ८ वाजेपर्यंतही उमेदवार शिक्षण उपसंचालक कार्यालयात थांबलेले होते. शुक्रवारी शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड घबराट पसरलेली आहे. अनेक वर्षांनंतर होत असलेल्या शिक्षक नोकरभरतीमध्ये संधी हुकण्याची भीती या उमेदवारांमध्ये दिसून आली. याविषयी शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.चौकट,महिलांना झाला प्रचंड त्रासशिक्षण उपसंचालक कार्यालयात शेकडो महिला उमेदवार आपल्या पाल्यांसह अर्ज दुरुस्तीसाठी आल्या होत्या. या कार्यालयात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे अनेकांना दूरपर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागली. दिवसभर कार्यालयाबाहेर बसल्यामुळे उन्हाच्या झळा, गर्मी यामुळे महिलांना अधिक त्रास झाला. यात नांदेडवरून आलेल्या दोन मुस्लिम महिलांना उपवास होता. उन्हामध्ये त्रास सहन करीत बसावे लागल्यामुळे या महिलांना अक्षरश: रडू कोसळले. या आहेत पोर्टलवरील तांत्रिक चुकाशिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना अनेक उमेदवारांचे लॉगिन होत नाही. लॉगिन झाल्यानंतर प्रेफरन्स चुकीचा दाखवला जातो. पासवर्ड मिसमॅच दाखविण्यात येतो. प्रेफरन्स दिल्यास दुसऱ्याच शाळेला दाखविण्यात येतात. ज्या शाळेत एकही रिक्त पद नाही. या सगळ्या चुका घेऊन बेरोजगार उमेदवार दुरुस्तीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखल झाले होते. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रTeachers Recruitmentशिक्षकभरती