शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

विजय मल्ल्यानंतर नीरव मोदी पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:39 IST

लिकर सम्राट विजय मल्ल्यानंतर डायमंड किं ग नीरव मोदीने देशाला बुडवून पळ काढला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सरकार आणि सरकारी बँकांना लगावला. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय उद्योग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देउद्योगमंत्र्यांचा टोला : लघु उद्योजक मातीशी जुळलेले आहेत, त्यांना बँकेने सहकार्य करावे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लिकर सम्राट विजय मल्ल्यानंतर डायमंड किं ग नीरव मोदीने देशाला बुडवून पळ काढला, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी सरकार आणि सरकारी बँकांना लगावला. सिडकोतील हॉटेल विंडसर कॅसल येथे आयोजित राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती हबच्या १९ व्या राज्यस्तरीय उद्योग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.बँकांवर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांना सरकारच वठणीवर आणू शकते. कृषी, उद्योगांना मोठे करण्यासाठी बँकांचे सहकार्य मोलाचे ठरणार असल्याचे सांगून उद्योगमंत्री देसाई म्हणाले, बँकांना वाटते सामान्य लोक बुडवून पळून जातील हा त्यांचा गैरसमज आहे. हे बुडवणारे लोक नाहीत. बुडवणारे लोक पळून जातात. एकतर अगोदर पळाला, मल्ल्या आणि काल नीरव पळाला. लघु उद्योजक पळणारे नसून ते या मातीशी जुळलेले आहेत. बँकांनी नकारार्थी मानसिकता ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.दोन वर्षांमध्ये शेंद्रा-बिडकीन येथील १० हजार एकर जागेचा विकास होईल. औरंगाबाद, जालना, माजलगाव येथील औद्योगिक क्षेत्रात एमएसएमईच्या उद्योगांसाठी २० टक्के तर एसटी-एससी उद्योगांसाठी १० टक्के भूखंड राखीव ठेवून त्यांना प्रोत्साहित करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला. एमआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक सोहम वायाळ यांनी डीएमआयसीमध्ये होत असलेल्या कामांची माहिती दिली.कियानंतर आॅरिकचा अँकर प्रकल्प ह्योसंगकोरियन कंपनी ‘ह्योसंग’ ही शेंद्र्यामध्ये ३ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे़ आॅरिकसाठी ह्योसंग’ हा अँकर प्रोजेक्ट ठरेल. ई-व्हेईकल क्षेत्रातील परदेशी कंपनी लोम्बोर्गिनी देखील राज्यात मोठी गुंतवणूक करणार आहे, असा दावा उद्योगमंत्री देसाई यांनी केला. हॉटेल ताज विवांता येथे आयोजित महाराष्ट्र एमएसएमई कन्व्हेंशन कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते़ यावेळी सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, नीरज माढेकर, महावीर लुणावत यांची उपस्थित होते़ महाराष्ट्रामध्ये ई-व्हेईकल उत्पादन क्षेत्रामध्ये लोम्बोर्गिनी ही कंपनी मोठी गुंतवणूक करणार आहे़ याशिवाय डीएमआयसीमधील शेंद्रा येथे टेक्स्टाईल क्षेत्रातील कोरियन कंपनी ह्योसंग ही कंपनी ३ हजार ४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे़ १०० एकर जागेमध्ये हा प्रकल्प उभारला जाईल. यातून एक हजार जणांना रोजगार मिळेल.