शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

गरज १५ हजार कोटींची; मिळाले ९५४ कोटी

By admin | Updated: March 19, 2016 01:09 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांकडे बजेटमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील प्

सुनील कच्छवे , औरंगाबाददुष्काळग्रस्त मराठवाड्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांच्या कामांकडे बजेटमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील प्रकल्पांच्या गरजेच्या तुलनेत केवळ ६ टक्केच निधी दिला आहे. मराठवाड्यातील रखडलेले सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण १५ हजार ३८५ कोटी रुपयांची गरज आहे. प्रत्यक्षात बजेटमध्ये ९५४ कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विभागातील सिंचनचे प्रकल्प यंदाही अपूर्णच राहणार आहेत.गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत मराठवाड्यात ७२ प्रकल्पांचे काम सुरू आहे. यातील काही सिंचन प्रकल्प कितीतरी वर्षांपासून रखडलेले आहेत. आता सततच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येथील पाण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी यंदा तरी अपूर्ण प्रकल्पांसाठी भरीव तरतूद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; मात्र ती फोल ठरली आहे. राज्य सरकारने संपूर्ण गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळासाठी १३६२ कोटी रुपयांची तरतूद केली, पण त्यातील ३७३ कोटी रुपये हे अहमदनगर आणि नाशिक (पान २ वर)गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यासाठी ११९७ कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना हा मोबदला मंजूर झालेला आहे.४तो वेळेत न मिळाल्यामुळे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली. त्यावर कोर्टाने सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तसेच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्च्या व इतर साहित्य जप्तीचे आदेश दिले. आताही महामंडळाला बाराशे कोटींच्या तुलनेत अवघा ५० कोटी रुपये निधी मिळाला आहे. त्यामुळे येत्या काळातही अधिकाऱ्यांच्या खुर्च्या जप्तीची ही कारवाई सुरूच राहण्याची शक्यता आहे.