शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

पारदर्शक लिखाण करण्याची गरज

By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST

जालना : शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून पत्रकार काम करतात. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी समाजाला

जालना : शासन आणि जनता यामधील दुवा म्हणून पत्रकार काम करतात. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी समाजाला लिखाणाच्या माध्यमातून जागृत करण्याबरोबरच पारदर्शक लिखाण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा मराठी पत्रकार संघ व परिषद, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. ‘सार्वजनिक कामकाजात पारदर्शकता : माध्यमांची भूमिका’ या विषयावर हा परिसंवाद होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख होते. यावेळी उपायुक्त विजयकुमार फड, प्रमुख वक्ते प्रा. बी.वाय. कुलकर्णी, अब्दूल हाफिज, रमेश खोत, अविनाश कव्हळे, कृष्णा तिडके, रवींद्र बांगड, प्रा. श्याम काबलेवाले, औरंगाबादचे जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे यांची प्रमुख उपस्थिती होती. नायक पुढे म्हणाले की, पत्रकारांना जिल्ह्यातील प्रशासनाची अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी एक प्रेसरूम सुरू करण्याची संकल्पना आहे. पत्रकार आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. पत्रकारांच्या अडीअडचणी सोडविण्यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य ते प्रयत्न केले जातील, असेही नायक यांनी सांगितले. उपायुक्त फड यांनी संतांचे कामही पत्रकारांसारखेच होते, असे सांगून काही उदाहरणे दिली. जनसामान्यांचे प्रबोधन करण्याचे, त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचे काम पत्रकारांचे असून पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनसामान्यांना ज्ञान देण्याचे पवित्र काम करून सत्याला पाठिंबा देण्याची गरज असल्याचे फड यांनी सांगितले.प्रा. कुलकर्णी यांनी पत्रकारिता म्हणजे खरे स्वातंत्र असल्याचे सांगून पत्रकारांनी केवळ इतिहास न मांडता किंवा त्यावर जास्त भर न देता वर्तमानावरील लिखाणावर भर द्यावा. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची खुर्ची व पत्रकारांनी त्यांची लेखणी हे उपजिविकेचे साधन असल्याने त्यांच्याशी इमान बाळगण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी देठे, हाफिज, कव्हळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप देशमुख यांनी पत्रकारांकडून मांडण्यात आलेल्या समस्यांवर प्रशासनाने दखल घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी योग्य प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब डोंगरे यांनी केले. तर बेबीसरोज अंबिलवादे यांनी आभार मानले. यावेळी शहरातील प्रमुख पत्रकार, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.