शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भेंडाळा फाट्यावर ट्रॅफिक सिग्नलची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:05 IST

कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंगापूरकडे जाणारी वाहतूक ...

कायगाव : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील भेंडाळा फाटा येथे ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंगापूरकडे जाणारी वाहतूक आणि पुण्याकडे सरळ जाणारी वाहतूक दिवसभर समोरासमोर येत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. येथे तात्काळ ट्रॅफिक सिग्नलची यंत्रणा बसवून पूर्णवेळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची गरज भासत आहे.

भेंडाळा फाटा हे औरंगाबाद- अहमदनगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. रस्त्याच्या दुतर्फा बाजूने हॉटेल्स, व्यावसायिक प्रतिष्ठान आणि पेट्रोलपंप यामुळे भेंडाळा फाट्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. गंगापूरकडे वळणारी वाहतूक आणि पुणे-अहमदनगरकडे सरळ जाणारी वाहतूक वारंवार समोरासमोर येत असल्याने भेंडाळा फाट्यावर दिवसभर वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यातही वाळूज-पंढरपूर येथील औद्योगिक वसाहतींची पुण्यातील औद्योगिक वसाहतीशी दररोजची देवाण-घेवाण असल्याने या मार्गावरून अवजड वाहतूकही मोठ्या प्रमाणावर सुरू असते. तसेच, गंगापूर- वैजापूर रस्त्याचे काम नव्याने झाल्यानंतर औरंगाबादहून नाशिक आणि मुंबईकडे जाणारी बरीचशी वाहतूक गंगापूरमार्गे वळवली आहे. त्याचा परिणामही भेंडाळा फाट्यावरच्या वाहतुकीवर झाला आहे. औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, श्रीरामपूर, नेवासा, नाशिक, मनमाड, शिर्डी, येवला, कोपरगाव, सिन्नर, घोटी आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक येथून प्रचंड वाढल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भेंडाळा फाट्यावर ट्रॅफिक सिग्नल सुरू करणे आवश्यक बनले आहे.

चौकट :

पादचाऱ्यांनाही धोका

भेंडाळा फाटा येथून औरंगाबाद आणि गंगापूर येथे शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या आणि वाळूज-पंढरपूर येथील औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. येथून होणारी वाहतूक भरधाव वेगाने सुरू असते. त्यामुळे भेंडाळा फाट्यावर ये-जा करण्यासाठी उभे राहणाऱ्या प्रवाशांच्या जिवालाही सिग्नल नसल्याने धोका निर्माण झाला आहे.

कोट

भेंडाळा फाट्यावरील वाहतुकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याबाबत संबंधित यंत्रणेला ट्रॅफिक सिग्नल बसविण्याची मागणी केली आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अपघात वाढल्याने येथील वाहतूक नियंत्रण होणे आवश्यक बनले आहे.

- शुभम बोकडीया, अगरवाडगाव.

फोटो :

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे राष्ट्रीय मार्गावरील भेंडाळा फाट्यावर गंगापूरकडे वळणारी वाहतूक आणि सरळ जाणारी वाहतूक समोरासमोर येत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. (तारेख शेख)