शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संवेदनशील वकील आणि न्यायाधीशांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:15 IST

न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्या. पी.एन. भगवती, न्या. व्यंकट चलय्या यांच्यासारखे न्यायाधीश तक्रारीसाठी आलेल्या पत्रालाही जनहित याचिका समजून ती केस लढायचे. या सगळ्या मंडळींमध्ये कायद्याचा अभिनव अर्थ काढण्याची ताकद होती; पण आता मात्र जनहित याचिकांच्या दृष्टीने पत्रांकडे पाहणाºया न्यायाधीश आणि वकिलांची संख्या कमी झाली आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

ठळक मुद्देअसीम सरोदे : ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’दरम्यान साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्या. पी.एन. भगवती, न्या. व्यंकट चलय्या यांच्यासारखे न्यायाधीश तक्रारीसाठी आलेल्या पत्रालाही जनहित याचिका समजून ती केस लढायचे. या सगळ्या मंडळींमध्ये कायद्याचा अभिनव अर्थ काढण्याची ताकद होती; पण आता मात्र जनहित याचिकांच्या दृष्टीने पत्रांकडे पाहणाºया न्यायाधीश आणि वकिलांची संख्या कमी झाली आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान आयोजित व समर्पण प्रतिष्ठान प्रस्तुत ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे शनिवारी संत तुकाराम नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज गोविंदवार यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, डॉ. दिगंत व अनघा आमटे, एव्हरेस्टवीर रफिक शेख आदींशी संवाद साधला.यावेळी अ‍ॅड. सरोदे म्हणाले की, आजच्या वकिलांनी आम्हालाच कायदा कळतो, असा आविर्भाव सोडून देण्याची आणि सर्वसामान्य माणसाने कायदा समजून घेण्याची गरज आहे. कायदा हा सामान्य, शक्तिहीन, ताकद नसलेल्या माणसांना न्याय देण्यासाठी आहे; पण आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. त्यामुळे दीडशहाणी मंडळीच कोर्टात गर्दी करतात आणि त्यांना न्याय मिळतो. कचºयाच्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे यासारखे प्रश्न म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले. औरंगाबादमध्ये स्वच्छता सर्वेक्षण जाहिरातीचे फलक सगळीकडे दिसतात; पण या शहरात कचरा वर्गीकरण, कचरा प्रक्रिया यासारखी कोणतीही यंत्रणा नसताना या जाहिरातींवर पैसा खर्च करणे मूर्खपणाचे असल्याचेही ते म्हणाले.बाबा आमटेंचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविणारे डॉ. दिगंत व डॉ. अनघा आमटे या दाम्पत्यानेही उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. लहानपणी हेमलकसाला राहताना जगात इतर भौतिक सुविधा असतात, हे आम्हाला माहितीच नव्हते. त्यामुळे आमचे बालपण फार कष्टात गेले, असे आम्हाला मुळीच वाटत नाही. उलट शहरातल्या बंदिस्त जीवनापेक्षा आम्ही खूप मोकळे आणि समृद्ध जीवन जगलो याचा आनंद होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.शिवस्मारकास विरोधलोकप्रिय भावनांना तयार क रणे हे येथील राजकारण्यांचे इंधन आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज समुद्रात शिवस्मारक उभे राहत आहे. येथे बिनडोक लोकांचे समूह असून, त्यांना पुतळे दिले, की ते नाचत बसतात आणि मूलभूत अडचणी आपोआप विसरतात, हे येथील राजकारण्यांनी पक्के जाणले आहे. मात्र, पुतळ्यांपेक्षा येथील माणसे उभी राहण्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे, अशा रोखठोक भाषेत अ‍ॅड. सरोदे यांनी शिवस्मारकास विरोध दर्शविला.