शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

संवेदनशील वकील आणि न्यायाधीशांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 00:15 IST

न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्या. पी.एन. भगवती, न्या. व्यंकट चलय्या यांच्यासारखे न्यायाधीश तक्रारीसाठी आलेल्या पत्रालाही जनहित याचिका समजून ती केस लढायचे. या सगळ्या मंडळींमध्ये कायद्याचा अभिनव अर्थ काढण्याची ताकद होती; पण आता मात्र जनहित याचिकांच्या दृष्टीने पत्रांकडे पाहणाºया न्यायाधीश आणि वकिलांची संख्या कमी झाली आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.

ठळक मुद्देअसीम सरोदे : ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’दरम्यान साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : न्यायमूर्ती कृष्णा अय्यर, न्या. पी.एन. भगवती, न्या. व्यंकट चलय्या यांच्यासारखे न्यायाधीश तक्रारीसाठी आलेल्या पत्रालाही जनहित याचिका समजून ती केस लढायचे. या सगळ्या मंडळींमध्ये कायद्याचा अभिनव अर्थ काढण्याची ताकद होती; पण आता मात्र जनहित याचिकांच्या दृष्टीने पत्रांकडे पाहणाºया न्यायाधीश आणि वकिलांची संख्या कमी झाली आहे, हे आपले दुर्दैव आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले.मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान आयोजित व समर्पण प्रतिष्ठान प्रस्तुत ‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमाचे शनिवारी संत तुकाराम नाट्यगृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज गोविंदवार यांनी अ‍ॅड. असीम सरोदे, डॉ. दिगंत व अनघा आमटे, एव्हरेस्टवीर रफिक शेख आदींशी संवाद साधला.यावेळी अ‍ॅड. सरोदे म्हणाले की, आजच्या वकिलांनी आम्हालाच कायदा कळतो, असा आविर्भाव सोडून देण्याची आणि सर्वसामान्य माणसाने कायदा समजून घेण्याची गरज आहे. कायदा हा सामान्य, शक्तिहीन, ताकद नसलेल्या माणसांना न्याय देण्यासाठी आहे; पण आपल्याकडे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. त्यामुळे दीडशहाणी मंडळीच कोर्टात गर्दी करतात आणि त्यांना न्याय मिळतो. कचºयाच्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे यासारखे प्रश्न म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी स्पष्ट केले. औरंगाबादमध्ये स्वच्छता सर्वेक्षण जाहिरातीचे फलक सगळीकडे दिसतात; पण या शहरात कचरा वर्गीकरण, कचरा प्रक्रिया यासारखी कोणतीही यंत्रणा नसताना या जाहिरातींवर पैसा खर्च करणे मूर्खपणाचे असल्याचेही ते म्हणाले.बाबा आमटेंचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविणारे डॉ. दिगंत व डॉ. अनघा आमटे या दाम्पत्यानेही उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. लहानपणी हेमलकसाला राहताना जगात इतर भौतिक सुविधा असतात, हे आम्हाला माहितीच नव्हते. त्यामुळे आमचे बालपण फार कष्टात गेले, असे आम्हाला मुळीच वाटत नाही. उलट शहरातल्या बंदिस्त जीवनापेक्षा आम्ही खूप मोकळे आणि समृद्ध जीवन जगलो याचा आनंद होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.शिवस्मारकास विरोधलोकप्रिय भावनांना तयार क रणे हे येथील राजकारण्यांचे इंधन आहे. त्याचाच परिपाक म्हणून आज समुद्रात शिवस्मारक उभे राहत आहे. येथे बिनडोक लोकांचे समूह असून, त्यांना पुतळे दिले, की ते नाचत बसतात आणि मूलभूत अडचणी आपोआप विसरतात, हे येथील राजकारण्यांनी पक्के जाणले आहे. मात्र, पुतळ्यांपेक्षा येथील माणसे उभी राहण्यासाठी प्रयत्न करायची गरज आहे, अशा रोखठोक भाषेत अ‍ॅड. सरोदे यांनी शिवस्मारकास विरोध दर्शविला.