शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज

By admin | Updated: June 17, 2014 01:14 IST

जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली

जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली असून, या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. घाणेवाडी जलाशयापासूनच कुंडलिका नदी वाहते अशी अनेकांची धारणा आहे, परंतु नदीचा उगम हा अजिंठा डोंगरातून झाला आहे. घाणेवाडी, निधोना पुढे रामतीर्थपर्यंत नदीपात्रास आता बऱ्यापैकी स्वरूप आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्याचा पुढाकार त्यास कारणीभूत आहे. परंतु, रामतीर्थपासून ते मंठा बायपासपर्यंत पुढे दुधना नदीला मिळणाऱ्या या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरून संयुक्त तसेच नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांसह माध्यमांकडून वारंवार ओरड होऊनसुद्धा काडीचेही प्रयत्न होत नाहीत. हे दुर्दैव आहे. कुंडलिका नदीवर निधोना व रामतीर्थ या दोन ठिकाणी शिरपूर पॅटर्नवर आधारीत बंधारे उभारणीचे काम यशस्वीरित्या झाले. त्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी-उद्योजकांनी अवलंबिलेला सकारात्मक दृष्टीकोनच कारणीभूत ठरला. आता ही या नदीवरच शिरपूर पॅटर्नवर आधारीत सहा बंधारे उभारले जाणार आहेत. त्यादृष्टीकोनातून नदीवरील लोकेशन निश्चित झाले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतासुद्धा त्यास मिळाली आहे. आता, त्याचे कामही निविदास्तरावर आहे. एकूण वर्षभराखेर त्याचे काम सुरू होईल, असा अंदाज आहे. या बंधाऱ्यांमुळे जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ होईल, शेकडो शेतकऱ्यांना फायदा होईलच. परंतु, रामतीर्थपासून जुना व नवीन जालन्यातील बहुतांश वसाहतींमधून जाणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाकरीता याच पद्धतीने स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आजपर्यंत सरकारी पातळीवरून काडीचेही प्रयत्न झाले नाहीत. पालिका प्रशासनानेसुद्धा या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणासंदर्भात खऱ्या अर्थाने विचारसुद्धा केला नाही. उलटपक्षी या दोन्ही नद्यांमधून संपूर्ण शहराचे सांडपाणी व केरकचऱ्याची विल्हेवाट लावून नद्या बकाल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलिकडे तर या नद्यांमधून केरकचऱ्यासह माती-मुरूमाचा भराव टाकून जागाच हडप करण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. त्याकडेही पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी पद्धतशीरपणे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन्ही नद्यांचे हे पात्र अरूंद होणार व या नद्यांना मोठ्या नाल्याचे स्वरूप येणार, हे स्पष्ट आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर या दोन्ही नद्या वाचविण्याकरीता हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यास मर्यादा आहेत. त्यामुळे नद्यांच्या पुनरूज्जीवनाच्या कामांना वेग येणार नाही, हेच स्पष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे शहरातून जाणाऱ्या या दोन्ही नद्या वाहत्या केल्या, त्याचे सौंदर्यीकरण केल्यास शहराचे स्वरूप बदलू शकते, परंतु त्यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. इच्छाशक्ती जागी झाल्यास या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग सहजपणे सुलभ होईल. दोन्ही नद्यांना पूर्वीचे स्वरूप प्राप्त होईल व शहरातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर पुनरूज्जीवीत होतील, हे निश्चित.