शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज

By admin | Updated: June 17, 2014 01:14 IST

जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली

जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली असून, या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. घाणेवाडी जलाशयापासूनच कुंडलिका नदी वाहते अशी अनेकांची धारणा आहे, परंतु नदीचा उगम हा अजिंठा डोंगरातून झाला आहे. घाणेवाडी, निधोना पुढे रामतीर्थपर्यंत नदीपात्रास आता बऱ्यापैकी स्वरूप आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्याचा पुढाकार त्यास कारणीभूत आहे. परंतु, रामतीर्थपासून ते मंठा बायपासपर्यंत पुढे दुधना नदीला मिळणाऱ्या या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरून संयुक्त तसेच नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांसह माध्यमांकडून वारंवार ओरड होऊनसुद्धा काडीचेही प्रयत्न होत नाहीत. हे दुर्दैव आहे. कुंडलिका नदीवर निधोना व रामतीर्थ या दोन ठिकाणी शिरपूर पॅटर्नवर आधारीत बंधारे उभारणीचे काम यशस्वीरित्या झाले. त्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी-उद्योजकांनी अवलंबिलेला सकारात्मक दृष्टीकोनच कारणीभूत ठरला. आता ही या नदीवरच शिरपूर पॅटर्नवर आधारीत सहा बंधारे उभारले जाणार आहेत. त्यादृष्टीकोनातून नदीवरील लोकेशन निश्चित झाले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतासुद्धा त्यास मिळाली आहे. आता, त्याचे कामही निविदास्तरावर आहे. एकूण वर्षभराखेर त्याचे काम सुरू होईल, असा अंदाज आहे. या बंधाऱ्यांमुळे जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ होईल, शेकडो शेतकऱ्यांना फायदा होईलच. परंतु, रामतीर्थपासून जुना व नवीन जालन्यातील बहुतांश वसाहतींमधून जाणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाकरीता याच पद्धतीने स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आजपर्यंत सरकारी पातळीवरून काडीचेही प्रयत्न झाले नाहीत. पालिका प्रशासनानेसुद्धा या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणासंदर्भात खऱ्या अर्थाने विचारसुद्धा केला नाही. उलटपक्षी या दोन्ही नद्यांमधून संपूर्ण शहराचे सांडपाणी व केरकचऱ्याची विल्हेवाट लावून नद्या बकाल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलिकडे तर या नद्यांमधून केरकचऱ्यासह माती-मुरूमाचा भराव टाकून जागाच हडप करण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. त्याकडेही पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी पद्धतशीरपणे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन्ही नद्यांचे हे पात्र अरूंद होणार व या नद्यांना मोठ्या नाल्याचे स्वरूप येणार, हे स्पष्ट आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर या दोन्ही नद्या वाचविण्याकरीता हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यास मर्यादा आहेत. त्यामुळे नद्यांच्या पुनरूज्जीवनाच्या कामांना वेग येणार नाही, हेच स्पष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे शहरातून जाणाऱ्या या दोन्ही नद्या वाहत्या केल्या, त्याचे सौंदर्यीकरण केल्यास शहराचे स्वरूप बदलू शकते, परंतु त्यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. इच्छाशक्ती जागी झाल्यास या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग सहजपणे सुलभ होईल. दोन्ही नद्यांना पूर्वीचे स्वरूप प्राप्त होईल व शहरातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर पुनरूज्जीवीत होतील, हे निश्चित.