शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय, प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज

By admin | Updated: June 17, 2014 01:14 IST

जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली

जालना : शहरातून वाहणाऱ्या व शाश्वत जलस्त्रोत असणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांची अवस्था भयावह झाली असून, या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. घाणेवाडी जलाशयापासूनच कुंडलिका नदी वाहते अशी अनेकांची धारणा आहे, परंतु नदीचा उगम हा अजिंठा डोंगरातून झाला आहे. घाणेवाडी, निधोना पुढे रामतीर्थपर्यंत नदीपात्रास आता बऱ्यापैकी स्वरूप आले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्याचा पुढाकार त्यास कारणीभूत आहे. परंतु, रामतीर्थपासून ते मंठा बायपासपर्यंत पुढे दुधना नदीला मिळणाऱ्या या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणाकरीता राजकीय व प्रशासकीय पातळीवरून संयुक्त तसेच नियोजनबद्ध प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांसह माध्यमांकडून वारंवार ओरड होऊनसुद्धा काडीचेही प्रयत्न होत नाहीत. हे दुर्दैव आहे. कुंडलिका नदीवर निधोना व रामतीर्थ या दोन ठिकाणी शिरपूर पॅटर्नवर आधारीत बंधारे उभारणीचे काम यशस्वीरित्या झाले. त्यासाठी काही राजकीय पुढाऱ्यांसह व्यापारी-उद्योजकांनी अवलंबिलेला सकारात्मक दृष्टीकोनच कारणीभूत ठरला. आता ही या नदीवरच शिरपूर पॅटर्नवर आधारीत सहा बंधारे उभारले जाणार आहेत. त्यादृष्टीकोनातून नदीवरील लोकेशन निश्चित झाले आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतासुद्धा त्यास मिळाली आहे. आता, त्याचे कामही निविदास्तरावर आहे. एकूण वर्षभराखेर त्याचे काम सुरू होईल, असा अंदाज आहे. या बंधाऱ्यांमुळे जमिनीतील पाणीपातळीत मोठी वाढ होईल, शेकडो शेतकऱ्यांना फायदा होईलच. परंतु, रामतीर्थपासून जुना व नवीन जालन्यातील बहुतांश वसाहतींमधून जाणाऱ्या सीना व कुंडलिका या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाकरीता याच पद्धतीने स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. या अनुषंगाने आजपर्यंत सरकारी पातळीवरून काडीचेही प्रयत्न झाले नाहीत. पालिका प्रशासनानेसुद्धा या नद्यांच्या पुनरूज्जीवनासह सौंदर्यीकरणासंदर्भात खऱ्या अर्थाने विचारसुद्धा केला नाही. उलटपक्षी या दोन्ही नद्यांमधून संपूर्ण शहराचे सांडपाणी व केरकचऱ्याची विल्हेवाट लावून नद्या बकाल करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अलिकडे तर या नद्यांमधून केरकचऱ्यासह माती-मुरूमाचा भराव टाकून जागाच हडप करण्याचा धंदा मोठ्या प्रमाणावर राबविला जात आहे. त्याकडेही पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी पद्धतशीरपणे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन्ही नद्यांचे हे पात्र अरूंद होणार व या नद्यांना मोठ्या नाल्याचे स्वरूप येणार, हे स्पष्ट आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी या पार्श्वभूमीवर या दोन्ही नद्या वाचविण्याकरीता हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, त्यास मर्यादा आहेत. त्यामुळे नद्यांच्या पुनरूज्जीवनाच्या कामांना वेग येणार नाही, हेच स्पष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे शहरातून जाणाऱ्या या दोन्ही नद्या वाहत्या केल्या, त्याचे सौंदर्यीकरण केल्यास शहराचे स्वरूप बदलू शकते, परंतु त्यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवरील इच्छाशक्तीची गरज आहे. इच्छाशक्ती जागी झाल्यास या दोन्ही नद्यांच्या पुनरूज्जीवनाचा मार्ग सहजपणे सुलभ होईल. दोन्ही नद्यांना पूर्वीचे स्वरूप प्राप्त होईल व शहरातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर पुनरूज्जीवीत होतील, हे निश्चित.