शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

वस्तुनिष्ठ लिखाणाची आवश्यकता - धारूरकर

By admin | Updated: May 27, 2015 00:38 IST

जालना : कायद्यापुढे प्रत्येक जण समान आहे. पत्रकारांनी जात, पात, धर्म, पंथ, पक्ष या गोष्टींपासून दूर राहून निरपेक्षपणे लिखाण करावे.

जालना : कायद्यापुढे प्रत्येक जण समान आहे. पत्रकारांनी जात, पात, धर्म, पंथ, पक्ष या गोष्टींपासून दूर राहून निरपेक्षपणे लिखाण करावे. लिखाणामध्ये वस्तुनिष्ठता असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील वृत्तपत्र व जनसंवाद विभागातील प्रा.डॉ. वि.ल. धारूरकर यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयातील वैकल्पिक वाद निवारण केंद्र येथे आयोजित ‘वृत्तपत्र कायदा’ या विषयावर आयोजित शिबिरात उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरकारी अभियोक्ता मुकुंद कोल्हे तर प्रमुख पाहुणे म्हणून तदर्थ जिल्हा न्यायाधीश वर्ग १ निरंजन रा. नाईकवाडे, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष एस.ए. तारेक, जिल्हा वकिल संघाचे उपाध्यक्ष महेश धन्नावत, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक कैलास लोया यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना धारूरकर म्हणाले की, बातमीचे लिखाण करताना संपादक किंवा प्रतिनिधींनी आचारसंहिता अंगीकारली पाहिजे. तसेच पत्रकारिता सरळपणे करत बातमीमध्ये वस्तुनिष्ठता जपली पाहिजे. माहितीच्या अधिकारामुळे पत्रकारांना सामर्थ्य लाभले असले तरी यामुळे पत्रकारांच्या जबाबदारीमध्ये मोठी वाढ झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी धारूरकर यांनी वृत्तपत्र नोंदणीचा कायदा, श्रमिक पत्रकार कायदा, बदनामीचा कायदा, न्यायालयाचा अवमान, कॉपीराईट कायदा या विषयावर उपस्थित पत्रकांराना सखोल मार्गदर्शन करण्याबरोबरच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिले. यावेळी बोलताना न्यायाधीश नाईकवाडे म्हणाले की, पत्रकारांनी वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीला अनुसरून बातमीचे लिखाण करावे. तसेच पत्रकारांसाठी असलेले कायदे व नियमांचे सखोल ज्ञान होण्यासाठी आयोजित केलेली शिबिरे हे नक्कीच पत्रकारांना उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून पत्रकारांसाठी असलेले कायद्याचे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरकारी अभियोक्ता मुकुंद कोल्हे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सामाजिक कार्यकर्ते कैलास लोया यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरास अ‍ॅड. अर्शद बागवान, अ‍ॅड. गणेश देशमुख यांच्यासह वृत्तपत्राचे संपादक, प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.