शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

३०० कोटीपेक्षा अधिकची वसुली हवी

By admin | Updated: June 25, 2014 01:05 IST

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांची ‘धमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे़

उस्मानाबाद : शेतकरी, शेतमजुरांची ‘धमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरून जिल्ह्याचे राजकारण तापले आहे़ डीसीसीने मे २०१४ अखेरपर्यंत जवळपास ७०० कोटी रूपयांचे शेती, बिगरशेतीचे कर्जवाटप केले आहे़ तर ठेवीदारांचे बँकेत ४१८ कोटी रूपये आहेत़ बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कर्जदारांकडील अनुत्पादक (थकित) जवळपास ३०८ कोटी रूपये आजघडीला वसूल होणे गरजेचे आहे.उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना व जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत़ जिल्हा बँक, तेरणा असो अथवा तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना असो शेतकरी, शेतमजुरांच्या अथक प्रयत्नातून या संस्था उभ्या राहिल्या आहेत़ प्रारंभीच्या काळात बँकेसह कारखान्याच्या कामकाजामुळे जिल्ह्याचे नाव राज्याच्या नकाशावर गेले होते़ सद्यस्थितीत जिल्हा बँकेचे सोसायटी सभासद १ लाख, ६४ हजार, ८७८, ठेवीदार सभासद ६ लाख, ३९ हजार तर २८९ संस्था सभासद आहेत़ डीसीसीने शेती, बिगर शेतीसाठी जवळपास ६९१ कोटी ८९ लाख, २४ हजार रूपयांचे कर्जवाटप केले आहे़ तर ठेवीदारांचे बँकेत ४२७ कोटी, २३ लाख, ६६ हजार ९४१ रूपये आहेत़ ही रक्कम पाहता बँकेला कर्जवसुलीनंतर ३०० कोटीच्या जवळपास फायदा होऊन बँकेचे पुढील व्यवहार सुरळीत चालणार आहेत़ बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकींग परवाना मिळविण्यासह सीबीएससाठी मोठे प्रयत्न केले आहेत़ त्या प्रयत्नामुळे अपेक्षित कर्जवसुली झाल्याने बँकेला बँकींग परवाना मिळाला़ तर शेती, बिगर शेती कर्जाच्या थकबाकीदारांमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडेच मोठ्या रक्कमा थकल्याचे दिसून येते़ त्यामुळे नेतेमंडळींनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राजकारण करण्याऐवजी स्वत:च्या कार्यकर्त्याकडील पैसा वसूल करून बँकेला देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज शेतकरी, ठेवीदार, सर्वसामान्यांतून होत आहे़ (प्रतिनिधी)६ कोटी कधी होणार वसूल ?जिल्हा बँकेचे जवळाबाजार (ता़औंढा नागनाथ जि़हिंगोली) येथील बाराशिव साखर कारखान्याकडून २ कोटी, १६ लाख, २९ हजार रूपये तर किल्लारी (ता़औसा जि़लातूर) येथील कारखान्याकडून ३ कोटी, ९८ लाख, ७८ हजार रूपयांची थकबाकी आहे़ जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना कर्जवाटप करून अनेक वर्षे लोटली तरी वसुली झालेली नाही़न्यायालयीन प्रक्रियेत अडकली वसुलीश्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना व तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने कारवाई केली होती़ तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची जवळपास ३७ हेक्टर ५३ आर जमीन व कारखान्याचे प्लॅन्ट, मशनरी जप्त केले होते़ मात्र, कारखान्याने मुंबई येथील डीआरएटी न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर कर्जवसुली होणार आहे़केंद्र, राज्य शासनाकडून २३५ कोटी येणेजिल्हा मध्यवर्ती बँकेचे राज्य शासनाकडून थकहमीचे ११४ कोटी, केंद्र शासनाचे सन २०११-१२ व १२-१३ चे व्याजपरतावाचे १५ कोटी, ५० लाख, केंद्र व राज्य शासनाकडून वैद्यनाथ समितीचे ९८ कोटी ७६ लाख, खादी ग्रामोद्योग कर्जमाफीचे ६ कोटी ५० लाख असे जवळपास २३४ कोटी, ७६ लाख रूपये येणे आहे़ ही रक्कम शासनाकडून आणण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्रित जोर लावण्याची आवश्यकता आहे़