शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

तंबाखूमुक्तीसाठी मन परिवर्तनाची गरज

By admin | Updated: April 1, 2017 00:12 IST

बीड : धूम्रपान, व्यसन या गोष्टी आरोग्याला घातक आहेत. हे माहीत असतानाही अनेक जण त्यापासून दूर राहत नाहीत.

बीड : धूम्रपान, व्यसन या गोष्टी आरोग्याला घातक आहेत. हे माहीत असतानाही अनेक जण त्यापासून दूर राहत नाहीत. तंबाखूमुक्तीसाठी मनपरिवर्तनाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.शहरातील जालना रोडवर जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित तंबाखू नियंत्रण कार्यशाळेत शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, डॉ. अशोक उनवणे, डॉ. संजय पाटील, डॉ. सत्येंद्र दबडगावकर यांची उपस्थिती होती. नवल किशोर राम म्हणाले, हुंडा पद्धती समाजातून नाहीशी व्हावी यासाठी कायदा आहे. मात्र, असे असतानाही तो सर्रास दिला आणि घेतला जातो. व्यसनाचेही असेच आहे. समाजाने त्यालाही जीवनाचा अविभाज्य भाग मानले आहे. चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या व्यसनाच्या उदात्तीकरणामुळे लोकांवर त्यांचा थेट प्रभाव पडतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.तंबाखूला हद्दपार करण्यासाठी डॉक्टर, आशा, अंगणवाडीसेविका, परिचारिका व समाजातील सुशिक्षित वर्गाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शिक्षकांनी तंबाखूमुक्त शाळेसाठी आग्रही राहावे. अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी असतात. त्यामुळे त्यांच्या वर्तनातही व्यसनाचा प्रभाव नसावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. समाजाने हे आव्हान स्वीकारले तर तंबाखूमुक्ती व्हायला वेळ लागणार नाही, असा दावाही त्यांनी केला. यावेळी डॉक्टर, आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)