शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज - टोपे

By admin | Updated: May 13, 2015 00:25 IST

घनसावंगी : शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी अंबड-घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना मंगळवारी केले.

घनसावंगी : शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी अंबड-घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना मंगळवारी केले.बैठकीला माजी खा. अंकुशराव टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, उत्तमराव पवार, अमरसिंह खरात, तात्यासाहेब उढाण, मनोज मरकड, तात्यासाहेब चिमणे, गणेश आर्दड, तालुकाध्यक्ष कल्याण सपाटे, नकूल भालेकर, मेहेरनाथ बोबडे हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या विरोधी असणारे असल्याने सरकारचया विरोधात नागरिकांनी एकत्र येवून लढा उभारला पाहिजे. शासनाने आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या हिताचा एकही धोरणात्मक निर्णय न घेतल्याने दुष्काळी परिस्थितीत मजुरांना काम नाही, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाबरोबर विम्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने त्यांना आधार देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा उभारणार असून, शेतकऱ्यांनी एकत्र येवून सरकारच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी राकाँ.च्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ व विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने ेउपस्थित रहावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.यावेळी अंकुशराव टोपे म्हणाले की, सत्तेसाठी केंद्र व राज्य सरकारने सामान्य जनतेला भूलथापा देवून सत्ता स्थापन केली. हे सरकार जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना मोठी झळ बसत आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना सरकार याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने सरकारच्या विरोधात उभे राहणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.