शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतप ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
5
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
6
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
7
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
8
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
10
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
11
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
12
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
13
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
14
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
15
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
16
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
17
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
18
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
19
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
20
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश

सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज - टोपे

By admin | Updated: May 13, 2015 00:25 IST

घनसावंगी : शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी अंबड-घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना मंगळवारी केले.

घनसावंगी : शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी अंबड-घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना मंगळवारी केले.बैठकीला माजी खा. अंकुशराव टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, उत्तमराव पवार, अमरसिंह खरात, तात्यासाहेब उढाण, मनोज मरकड, तात्यासाहेब चिमणे, गणेश आर्दड, तालुकाध्यक्ष कल्याण सपाटे, नकूल भालेकर, मेहेरनाथ बोबडे हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या विरोधी असणारे असल्याने सरकारचया विरोधात नागरिकांनी एकत्र येवून लढा उभारला पाहिजे. शासनाने आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या हिताचा एकही धोरणात्मक निर्णय न घेतल्याने दुष्काळी परिस्थितीत मजुरांना काम नाही, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाबरोबर विम्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने त्यांना आधार देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा उभारणार असून, शेतकऱ्यांनी एकत्र येवून सरकारच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी राकाँ.च्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ व विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने ेउपस्थित रहावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.यावेळी अंकुशराव टोपे म्हणाले की, सत्तेसाठी केंद्र व राज्य सरकारने सामान्य जनतेला भूलथापा देवून सत्ता स्थापन केली. हे सरकार जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना मोठी झळ बसत आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना सरकार याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने सरकारच्या विरोधात उभे राहणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.