शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज - टोपे

By admin | Updated: May 13, 2015 00:25 IST

घनसावंगी : शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी अंबड-घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना मंगळवारी केले.

घनसावंगी : शेतकऱ्यांच्या विरोधी असणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राजेश टोपे यांनी अंबड-घनसावंगी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत बोलताना मंगळवारी केले.बैठकीला माजी खा. अंकुशराव टोपे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, उत्तमराव पवार, अमरसिंह खरात, तात्यासाहेब उढाण, मनोज मरकड, तात्यासाहेब चिमणे, गणेश आर्दड, तालुकाध्यक्ष कल्याण सपाटे, नकूल भालेकर, मेहेरनाथ बोबडे हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना टोपे म्हणाले की, केंद्र व राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या व सामान्य नागरिकांच्या विरोधी असणारे असल्याने सरकारचया विरोधात नागरिकांनी एकत्र येवून लढा उभारला पाहिजे. शासनाने आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या हिताचा एकही धोरणात्मक निर्णय न घेतल्याने दुष्काळी परिस्थितीत मजुरांना काम नाही, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाबरोबर विम्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने त्यांना आधार देण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा उभारणार असून, शेतकऱ्यांनी एकत्र येवून सरकारच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी राकाँ.च्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भूजबळ व विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे उपस्थित राहणार असून, शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने ेउपस्थित रहावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.यावेळी अंकुशराव टोपे म्हणाले की, सत्तेसाठी केंद्र व राज्य सरकारने सामान्य जनतेला भूलथापा देवून सत्ता स्थापन केली. हे सरकार जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना मोठी झळ बसत आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना सरकार याकडे गांभिर्याने पाहत नाही. शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने सरकारच्या विरोधात उभे राहणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.