शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रबोधन आवश्यक

By admin | Updated: August 29, 2014 01:32 IST

औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औरंगाबाद शहराची वाहतूक समस्याही क्लिष्ट होत चालली आहे. येथील रस्ते मोठे झाले तरी वाहतूक समस्या काही सुटलेली नाही.

औरंगाबाद : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या औरंगाबाद शहराची वाहतूक समस्याही क्लिष्ट होत चालली आहे. येथील रस्ते मोठे झाले तरी वाहतूक समस्या काही सुटलेली नाही. शंभर फुटी जालना रोडचा वापर ६० फुटांपर्यंतच होतोय. हे चित्र बदलून अपघातांना आळा घालण्यासाठी विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांचे प्रबोधन आवश्यक असून, त्या दृष्टीने नियोजित वाहतूक उद्यान उपयोगी ठरेल, असा विश्वास आज येथे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज येथे व्यक्त केला. सिद्धार्थ उद्यानात ते वाहतूक उद्यानाचे भूमिपूजन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर कला ओझा होत्या, तर मंचावर विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांची उपस्थिती होती. राजेंद्र सिंह व कला ओझा यांनी शहरातील वाहतूक समस्येवर प्रकाश टाकला. डीएमआयसीबद्दल अभिमानाने बोलत असताना शेंद्रा भागातील वाढती अतिक्रमणे ही चिंतेची बाब होय. या अतिक्रमणाकडे लक्ष वेधत राजेंद्र दर्डा यांनी ही अतिक्रमणे वेळीच काढून टाकण्याचीही सूचना यावेळी केली. टीम औरंगाबादच्या माध्यमातून येत असलेल्या विविध सूचनांकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. शहरात पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने वाहनधारकांकडून चुका होतात, असे ते म्हणाले. प्रारंभी, नामफलकाचे अनावरण करण्यात आले. २६ जानेवारीपर्यंत या वाहतूक उद्यानाचे काम पूर्ण होऊन ते जनतेसाठी खुले करावे, असे सध्या तरी ठरले आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, उद्यान अधीक्षक विजय पाटील आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. डी.पी. कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. असे राहील वाहतूक उद्यान....गतवर्षी औरंगाबाद शहरात किरकोळ स्वरूपाचे तसेच गंभीर स्वरूपाचे जवळजवळ ७१२ अपघात झाले. तसेच यंदा गेल्या सहा महिन्यांत ३०० पेक्षा अधिक अपघात झाले आहेत. हे लक्षात घेऊन नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सिद्धार्थ उद्यानात या वाहतूक उद्यानाची उभारणी करण्याचे ठरले.या वाहतूक उद्यानात ४५ प्रकारचे दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना- पर्यटकांना त्यांच्या वाहनाची गती किती असावी, वाहन रस्त्याच्या कुठल्या भागात थांबवायचे यासाठी थांबा फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय नो एंट्रीचा फलक, ओव्हरटेक करताना घ्यावयाची काळजी, रेल्वेचे रूळ ओलांडताना काय काळजी घ्यावी, यासाठी सायकल किंवा पायी चालताना, शाळा- कॉलेजेस आले असता त्या ठिकाणी घ्यावयाची काळजी, यासंबंधीचे फलक लावण्यात येणार आहेत. तसेच विविध ठिकाणी वाहतूक सिग्नलही बसविण्यात येणार आहेत.या उद्यानात रेल्वे क्रॉसिंग, फ्लाय ओव्हरब्रिज, पादचारी मार्ग, अवघड वळण मार्ग व उंच बोगदा तयार करण्यात येणार आहे. आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी ही माहितीदिली.सध्या औरंगाबादमध्ये कार्यरत असलेली अधिकाऱ्यांची टीम चांगली आहे. त्यांच्यात योग्य समन्वय आहे. मनात आणले तर ते योग्य मार्ग काढून कामे करू शकतात, असे गौरवोद्गार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात काढले. या दोन्ही कामांसाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून देण्यात आलाआहे. ४याकामी या सर्व अधिकाऱ्यांनी विशेष रुची घेतली, याचा राजेंद्र दर्डा यांनी विशेष उल्लेख करून ‘ही सारी टीम चांगले काम करीत आहे’ असे उद्गार काढले. मंचावर विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी विक्रमकुमार व मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. वाहतूक उद्यानात व कमल उद्यानाच्या सौंदर्यीकरणाच्या कामात या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातले, पाठपुरावा केला.