शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

संविधानविषयक सर्वसामान्यांमध्ये जागृतीची गरज

By admin | Updated: April 20, 2015 00:30 IST

जालना : सर्वसामान्यांना न्याय, समता, अधिकार मिळावेत, हाच संविधानाचा उद्देश होता, असे सांगून अ‍ॅड. महेंद्र जाधव व प्रा. दिगंबर कांबळे (हैद्राबाद) यांनी

जालना : सर्वसामान्यांना न्याय, समता, अधिकार मिळावेत, हाच संविधानाचा उद्देश होता, असे सांगून अ‍ॅड. महेंद्र जाधव व प्रा. दिगंबर कांबळे (हैद्राबाद) यांनी आपल्या व्याख्यानातून सर्वसामान्यांपर्यंत संविधानविषयक जनजागृती व्हावी, असे आवाहन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी जिल्हा वकील संघाच्या वतीने येथील न्यायालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अ‍ॅड. जाधव, प्रा. कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता डॉ. रेणुका भावसार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सय्यद तारीक, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. मुकुंद कोल्हे, अ‍ॅड. महेश धन्नावत, अ‍ॅड. अरविंद मुरमे यांची प्रमुख उपस्थिती होती.अर्थप्राप्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीला अधिक महत्व दिले. शेतीचे राष्ट्रीयकरण व्हावे, हा मुद्दा त्यांनी उचलून धरला. राष्ट्रीयकरणामुळे देशावर नियंत्रण राहील.शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा होईल, असे डॉ. आंबेडकर यांनी पटवून दिले होते. डॉ. आंबेडकर यांनी सर्वात जास्त लिखाण अर्थशास्त्रावर केले. ते महान अर्थतज्ज्ञ होते, असेही उभयंतांनी आपल्या व्याख्यानाद्वारे सांगितले.यावेळी अ‍ॅड. बी.एम. साळवे, अ‍ॅड. बी.एम. ससाने, अ‍ॅड. झेड. बी. मिसाळ, अ‍ॅड. मनोरमा तिडके, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, अ‍ॅड. गोविंद रत्नपारखी, अ‍ॅड. भगवान गिराम, अ‍ॅड. माणिकराव बनसोडे, अ‍ॅड. राजेंद्र साळवे, सुभाष देवीदान, अ‍ॅड. रेखा कांबळे, रेखा जाधव, अ‍ॅड. महेंद्र साळवे, अ‍ॅड. गणेश देशमुख आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)