शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

खरिपासाठी दीड लाख क्विंटल बियाणांची गरज

By admin | Updated: May 14, 2017 23:04 IST

लातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़ तसेच या हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला आहे़ यंदाच्या हंगामात पेरणीसाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणांची आवश्यकता असून सर्वाधिक बियाणे सोयाबीनचे लागणार आहे़यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ त्यामुळे सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेतीची कामे आटोपण्यात व्यस्त आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणे, कुळवणी आदी तीव्र उन्हातली कामे पूर्ण केली आहेत़ ज्या थोड्याफार शेतकऱ्यांची ही कामे शिल्लक राहिली आहेत, ते ही कामे पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात खरीपाचे साधारणत: साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे़ वेळेवर पाऊस होणार असल्याने बहुतांश शेतकरी सध्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची दुरुस्ती, जुळवाजुळव करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ शेतकऱ्यांबरोबरच कृषी विभागही सज्ज झाला आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या हंगामासाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणे आवश्यक असल्याचा अहवाल तयार करुन या बियाणांचा प्रस्ताव पुण्याच्या कृषी आयुक्तांकडे सादर केला आहे़ त्यापैकी ५४ हजार ८७ क्विं़ बियाणे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली़