शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

खरिपासाठी दीड लाख क्विंटल बियाणांची गरज

By admin | Updated: May 14, 2017 23:04 IST

लातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़ तसेच या हंगामासाठी कृषी विभागही सज्ज झाला आहे़ यंदाच्या हंगामात पेरणीसाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणांची आवश्यकता असून सर्वाधिक बियाणे सोयाबीनचे लागणार आहे़यंदाही वेळेवर आणि अपेक्षित पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़ त्यामुळे सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व शेतीची कामे आटोपण्यात व्यस्त आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नांगरणी, मोगडणे, कुळवणी आदी तीव्र उन्हातली कामे पूर्ण केली आहेत़ ज्या थोड्याफार शेतकऱ्यांची ही कामे शिल्लक राहिली आहेत, ते ही कामे पूर्ण करीत असल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्यात खरीपाचे साधारणत: साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र आहे़ वेळेवर पाऊस होणार असल्याने बहुतांश शेतकरी सध्या पेरणीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची दुरुस्ती, जुळवाजुळव करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ शेतकऱ्यांबरोबरच कृषी विभागही सज्ज झाला आहे़ जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने या हंगामासाठी १ लाख ४४ हजार ८३२ क्विं़ बी- बियाणे आवश्यक असल्याचा अहवाल तयार करुन या बियाणांचा प्रस्ताव पुण्याच्या कृषी आयुक्तांकडे सादर केला आहे़ त्यापैकी ५४ हजार ८७ क्विं़ बियाणे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली़