शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

‘अमृत’ सेवा गोठलेलीच !

By admin | Updated: May 19, 2014 01:31 IST

हरी मोकाशे, लातूर अपघात अथवा गंभीर आजारी असलेला रुग्ण रक्ताअभावी जीवास मुकू नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़

हरी मोकाशे,  लातूर अपघात अथवा गंभीर आजारी असलेला रुग्ण रक्ताअभावी जीवास मुकू नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेने जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़ गेल्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत सेवेद्वारे केवळ ४९ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला आहे़ खाजगी रक्तपेढीतून रक्त पुरवठा होण्याची संख्या मात्र ११ हजार ४०१ पेक्षा जास्त आहे़ जनजागृतीच झाली नसल्याने रुग्णांना या योजनेचा लाभ घेता येत नसल्याचे पहावयास मिळत आहे़ गरीब कुटुंबातील रुग्णांना अल्प दरात तात्काळ रक्त मिळत नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य शासनाच्या अंतर्गतच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने गेल्या डिसेंबरपासून जीवन अमृत सेवा योजना सुरु केली आहे़ अपघात अथवा गंभीर आजारी असलेल्या रुग्णास रक्ताची आवश्यकता भासल्यास त्यांच्या नातेवाईकांची रक्तासाठी धावपळ होऊ नये़ तसेच खाजगी रक्तपेढीतून आर्थिक लूट केली जाऊ नये म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे़ १०४ या टोल फ्री क्रमांकावरुन देण्यात येणारी ही सेवा प्रत्यक्षात राज्यात जानेवारीपासून सुरु झाली आहे़ रुग्णाने अथवा त्यांच्या नातेवाईकाने टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन रुग्णालयाचे नाव, संपूर्ण पत्ता, माहिती असल्यास रक्तगट, रक्त अथवा रक्तघटक यापैकी कशाची आवश्यकता आहे, त्याची माहिती देणे अपेक्षित आहे़ या क्रमांकावर भ्रमणध्वनीवरुन कॉल केल्यानंतर अवघ्या एक तासाच्या आत रक्तपुरवठा केला जातो़ या सेवेसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणाही उभी करण्यात आली आहे़ लातूर जिल्ह्यासाठी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात ही यंत्रणा असून तेथून ४० किमीपर्यंतच्या रुग्णास रक्त पुरवठा केला जातो़ लातूर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीसह खाजगी चार रक्तपेढ्या आहेत़ जीवन अमृत सेवा योजनेअंतर्गत ५०० रूपयांपर्यंत रक्तपिशवी मिळते़ खाजगी रक्तपेढीत याचा दर जवळपास दुप्पट दर आहे़ ही सेवा सुरु होऊन जवळपास साडेचार महिन्यांचा कालावधी उलटला असताना आजपर्यंत केवळ ४९ पिशव्या रक्तपुरवठा करण्यात आला आहे़ त्याच्या तुलनेत खाजगी रक्तपेढ्यांतून ११ हजार ४०१ रक्तपिशव्यांचा पुरवठा करण्यात आला आहे़ मोठा गाजावाजा करुन सुरू करण्यात आलेल्या या सेवेची अद्यापही सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांमध्ये जनजागृतीच झालेली नसल्याचे दिसून येत आहे़ डॉक्टरांनी रुग्णास रक्ताची आवश्यकता आहे, असे सांगितले असता रुग्णांचे नातेवाईक खाजगी रक्तपेढींकडे धाव घेत असल्याचे पहावयास मिळत आहे़ गरीब कुटुंबातील रुग्णांच्या नातेवाईकांची तारांबळ होऊ नये म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे़ परंतु, सामान्यांना योजनेसंदर्भात माहितीच नसल्याने प्रतिसाद मिळत नाही़ मागणीनुसार रक्तपुरवठा करण्यात येत असल्याचे जीवन अमृत सेवेतील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता जी़ आऱ मुसांडे यांनी सांगितले़ खाजगी डॉक्टरांची अडचण़़़़ ही सेवा आपल्या रुग्णालयातील रुग्णांना देण्यासाठी खाजगी डॉक्टरांना आपल्या दवाखान्याची इत्यंभूत माहिती द्यावी लागते़ त्याचबरोबर या सेवेतंर्गत रजिस्ट्रेशन करावे लागते़ दवाखान्याची माहिती शासनाकडे सादर होणार असल्याने खाजगी डॉक्टर दुसर्‍यासाठी आपल्या मागे कटकट नको म्हणून तात्काळ रक्ताची गरज आहे़ ते कुठुनही उपलब्ध करावे असे सांगून हात झटकतात़