शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या जवळपास सर्वच योजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:04 IST

स. सो. खंडाळकर औरंगाबाद : ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे’, असा संदेश देणाऱ्या साहित्यरत्न ...

स. सो. खंडाळकर

औरंगाबाद : ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे’, असा संदेश देणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावावर चालणारे आर्थिक विकास महामंडळ जणू शेवटच्या घटका मोजत आहे. या महामंडळाच्या जवळपास सर्वच योजना गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. जेमतेम दोन योजना रडतखढत चालू आहेत. त्यातच कोरोनाचा जबरदस्त फटका बसल्याने वसुलीचे प्रमाण तर कमालीचे घटले आहे.

मागच्या काही वर्षांपासून अगोदरच हे महामंडळ गैरव्यवहाराच्या प्रकरणाने गाजत आहे. महामंडळाला मिळणारा शासकीय निधी आता जवळपास मिळतच नाही. या व मागच्याही शासनाचे धोरण हे महामंडळ चालावे, असे दिसत नसल्याचा आरोप विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी करीत आहेत.

विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य योजना व बीजभांडवल योजना या दोनच योजना सुरू आहेत. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या चार जिल्ह्यांसाठी असलेल्या कार्यालयातील प्रादेशिक व्यवस्थापक के. बी. पवार यांनी सांगितले की, चारही जिल्ह्यांचे विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य योजनेचे उद्दिष्ट अवघे ४०० व बीजभांडवल योजनेचे उद्दिष्ट १४० इतके आहे. केंद्रीय अर्थसाहाय्य योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले होते. ३० जुलैपर्यंत तीनशे अर्ज आले. दहा हजार रु. अनुदान वगळून बाकीची रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होते. कर्जफेड ३६ ते ६० मासिक समान हप्त्यात करावी लागते.

चौकट.....................

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजना, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ (एनएसएफडीसी) दिल्ली यांच्याकडील योजनेंतर्गत मुदत कर्ज योजना, लघुऋषण वित्त योजना, महिला समृध्दी योजना, महिला किसान योजना, शैक्षिणक कर्ज योजना बंद आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांना देशातील व परदेशातील शासनमान्य व अधिकृत संस्थांमार्फत अभियांत्रिकी, वास्तूविशारद, वैद्यकीय, फार्मसी, दंत चिकित्सक, कायदा यासारख्या शिक्षणासाठी होणारे कर्ज वितरण तसेच सीए, सीएस, आयसीडब्ल्यू यासारख्या शिक्षणासाठी होणारे कर्ज वितरणही बंद आहे.

११ जुलै १९८५ रोजी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाच्या विविध योजनांचा मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखणी मातंग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मानग गारुडी, मांग गारुडी, मादगी व मादिगा यांना लाभ मिळत होता. आता तो जवळपास बंदच आहे.