शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

...तर शेतकरी हातात रुमणे घेतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:39 IST

सरसकट कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्ट्रवादीची नाळ शेतक-यांशी जोडलेली आहे. त्यांच्या प्रश्नावर लढलो, लढत आहोत आणि लढत राहूत. हा मोर्चा नसून एक इशारा समजा. आता शेतक-यांचा संयम सुटला असून, महिन्याची मुदत देत आहोत. या कालावधीत मागण्या मान्य केल्या नाहीत तर शेतकरी हातात रुमणे घेतील, असा इशारा भाजप सरकारला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.सरसकट कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व धनंजय मुंडे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाºयांसह कार्यकर्ते, शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.पुढे धनंजय मुंडे म्हणाले, मागील २२ वर्षांत जिल्ह्यात असा मोर्चा झाला नाही. या मोर्चाने इतिहास घडविला. मोदी सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सर्वसामान्यांची दिशाभूल केली. अच्छे दिन केवळ जय शाह व भाजप नेत्यांनाच आले आहेत. सर्वसामान्यांचे तर अच्छे होते, तेही बुरे दिन झाले आहेत. महागाई वाढणार नाही, असे सरकारने सांगितले; परंतु पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. ‘भाईयों और बहनों’ म्हणून ४०० रुपयांचे सिलेंडर ८०० वर नेले अन् ‘अबकी बार मोदी सरकार’ घ्या गोंदवून, असे म्हणून मुंडेंनी मोदी सरकारची खिल्ली उडविली.दिवाळीच्या तोंडावर जनसामान्यांच्या तोंडची साखर पळविली. दिवाळीही कडू झाली. ‘अरे खायेगा इंडिया, तो जागेगा इंडिया’ असे म्हणूनही मुंडेंनी सरकारवर घणाघाती आरोप केले. कर्जमाफीबद्दल ते म्हणाले, या सरकारला कर्जमाफी म्हणजे काय, हेच माहीत नाही. त्यांनी अभ्यास करावा. ही कर्जमाफी फसवी आहे. शेतक-यांची फसवणूक या सरकारने केली आहे. महापुरुषांचे नाव देऊन त्यांचा अपमान केल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.दरम्यान, नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उपस्थित इतर मान्यवरांनीही मोर्चाला संबोधित केले. सरकारवर सर्वांनीच कडाडून टीका केली.