शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकरी हातात रुमणे घेतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 23:39 IST

सरसकट कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : राष्ट्रवादीची नाळ शेतक-यांशी जोडलेली आहे. त्यांच्या प्रश्नावर लढलो, लढत आहोत आणि लढत राहूत. हा मोर्चा नसून एक इशारा समजा. आता शेतक-यांचा संयम सुटला असून, महिन्याची मुदत देत आहोत. या कालावधीत मागण्या मान्य केल्या नाहीत तर शेतकरी हातात रुमणे घेतील, असा इशारा भाजप सरकारला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.सरसकट कर्जमाफीसह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे नेतृत्व धनंजय मुंडे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकाºयांसह कार्यकर्ते, शेतकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.पुढे धनंजय मुंडे म्हणाले, मागील २२ वर्षांत जिल्ह्यात असा मोर्चा झाला नाही. या मोर्चाने इतिहास घडविला. मोदी सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सर्वसामान्यांची दिशाभूल केली. अच्छे दिन केवळ जय शाह व भाजप नेत्यांनाच आले आहेत. सर्वसामान्यांचे तर अच्छे होते, तेही बुरे दिन झाले आहेत. महागाई वाढणार नाही, असे सरकारने सांगितले; परंतु पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. ‘भाईयों और बहनों’ म्हणून ४०० रुपयांचे सिलेंडर ८०० वर नेले अन् ‘अबकी बार मोदी सरकार’ घ्या गोंदवून, असे म्हणून मुंडेंनी मोदी सरकारची खिल्ली उडविली.दिवाळीच्या तोंडावर जनसामान्यांच्या तोंडची साखर पळविली. दिवाळीही कडू झाली. ‘अरे खायेगा इंडिया, तो जागेगा इंडिया’ असे म्हणूनही मुंडेंनी सरकारवर घणाघाती आरोप केले. कर्जमाफीबद्दल ते म्हणाले, या सरकारला कर्जमाफी म्हणजे काय, हेच माहीत नाही. त्यांनी अभ्यास करावा. ही कर्जमाफी फसवी आहे. शेतक-यांची फसवणूक या सरकारने केली आहे. महापुरुषांचे नाव देऊन त्यांचा अपमान केल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.दरम्यान, नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसाने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उपस्थित इतर मान्यवरांनीही मोर्चाला संबोधित केले. सरकारवर सर्वांनीच कडाडून टीका केली.