शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मनपाकडे फेरीवाल्यांची नोंद, मदतीचे निकष अद्याप प्राप्त नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री ८ वाजतापासून लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची उपासमार होऊ ...

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री ८ वाजतापासून लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. औरंगाबाद शहरात महापालिकेकडे १४ हजार १०३ फेरीवाल्यांची नोंद आहे. राज्य शासनाकडून देण्यात येणारी आर्थिक मदत कोणत्या निकषावर राहील, हे अद्याप स्पष्ट नाही.

महाराष्ट्र शासनाने मंगळवारी सायंकाळी लॉकडाऊनची घोषणा केली. सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मोठे आर्थिक पॅकेज देण्याची घोषणा करण्यात आली. यामध्ये फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत. औरंगाबाद शहरात मागील वर्षीच महापालिकेने सर्वेक्षण केले होते. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षणात १४ हजार १०३ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आलेली आहे. महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये फेरीवाल्यांना पंधराशे रुपये कोणत्या निकषावर देणार, हे अद्याप स्पष्ट नाही. निधी वाटपाचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील. महापालिकेकडून फक्त यादी सादर करण्याचे काम होणार आहे. लाभार्थ्यांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे का? याचाही कुठेही उल्लेख झालेला नाही. एक ते दोन दिवसात यावर अंतिम निर्णय होईल.

१४,१०३

शहरातील नोंदणीकृत फेरीवाले

काय समस्या

फेरीवाल्यांना आर्थिक पॅकेज कोणत्या निकषावर द्यावेत, याबाबत राज्य शासनाकडून सविस्तर माहिती प्राप्त झाली नाही.

फेरीवाले म्हणतात,

रक्कम हातात पडावी

राज्य शासनाकडून फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये देण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात रक्कम हातात येईपर्यंत काही खरे नाही. वेगवेगळे नियम दाखवून लाभार्थ्यांना डावलण्याची शक्यता आहे.

राजेंद्र म्हस्के

ज्यांची नोंद नाही त्यांचे काय

मागील वर्षी अत्यंत घाईगडबडीत महापालिकेने सर्वेक्षण केले. लॉकडाऊनमुळे अनेक फेरीवाले आपापल्या गावी गेले होते. ते परत आल्यानंतर महापालिकेने नोंदणी केलेली नाही. त्यामुळे असंख्य फेरीवाले शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार आहेत.

अयाज शेख.

थेट खात्यात रक्कम जमा करावी

महाराष्ट्र शासनाने फुल ना फुलाची पाकळी म्हणून फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम शासनाने प्रत्येकाच्या खात्यात जमा करायला हवी. लॉकडाऊनमध्ये प्रत्येकाला ही रक्कम कामाला तरी येईल.

राजेंद्र पवार.