शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नवविचारांच्या अंकुराचे जतन व्हावे

By admin | Updated: June 2, 2015 00:23 IST

औरंगाबाद : जैविक व भौगोलिक विविधतेने नटलेल्या विद्यापीठ परिसरात सृजनशील विचारांचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत

औरंगाबाद : जैविक व भौगोलिक विविधतेने नटलेल्या विद्यापीठ परिसरात सृजनशील विचारांचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. या नव्या विचारांच्या अंकुराचे जतन व्हावे, असे प्रतिपादन जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मानवेंद्र काचोळे यांनी केले. डॉ. काचोळे हे काल ३१ मे रोजी विद्यापीठ सेवेतून निवृत्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे डॉ. काचोळे यांचा सेवागौरव करण्यात आला. व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्र म झाला. यावेळी ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. के. व्ही. काळे, कुलसचिव डॉ. गणेश मंझा, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. काचोळे यांचा कुलगुरू यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. काचोळे म्हणाले, विद्यार्थी म्हणून विद्यापीठात दाखल झालो. आज प्राध्यापक (वरिष्ठ श्रेणी) या पदावरून निवृत्त होत आहे. आयुष्याची ४० वर्षे या परिसरात घालविली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य जतन झाले पाहिजे. शिक्षण, संशोधनाचा दर्जा राष्ट्रीय स्तरावर पोहोचला पाहिजे, असेही ते म्हणाले. विद्यापीठातील विहिरी, तलावांमध्ये मुबलक पाणी असून, स्रोत ही आपली संपत्ती आहे. त्याचे व्यवस्थित नियोजन व्हावे, अशी अपेक्षाही काचोळे यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे म्हणाले, डॉ. काचोळे यांच्यासारख्या वरिष्ठ प्राध्यापकांनी विद्यापीठाचा नावलौकिक उंचावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही कुलगुरू म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मोराळे यांनी केले. यावेळी डॉ. अशोक गिरी, डॉ. एस. जी. गोविंदवार, आकाशवाणीचे निवेदक मुजीफ खान, सहा. ग्रंथपाल डॉ. शाहिता परवीन आदींची उपस्थिती होती.