शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ११ जोडप्यांचे संसार पुन्हा जुळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कौटुंबिक कलहातून विभक्त झालेल्या ११ पती-पत्नींचे (जोडप्यांचा) वाद शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मिटविण्यात आले असून, आता त्यांचे ...

औरंगाबाद : कौटुंबिक कलहातून विभक्त झालेल्या ११ पती-पत्नींचे (जोडप्यांचा) वाद शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मिटविण्यात आले असून, आता त्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत. महालोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवलेल्या २८ प्रकरणांतील १४ जोडपी हजर झाली होती.

कौटुंबिक न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी २८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १४ जोडपी हजर होती. या जोडप्यांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यांची मने वळविण्यात यश आल्यामुळे ११ जोडप्यांचा दुभंगलेला संसार पुन्हा जुळला. दोन प्रकरणे तडजोडीअंती निकाली काढण्यात आली आहेत, तर १४ प्रकरणांमध्ये उभय पक्षकार गैरहजर राहिले.

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्या. आशिष अयाचित, न्या. व्ही. आर. जगदाळे यांनी पॅनल प्रमुख म्हणुन काम पाहिले, तर विधिज्ञ ॲड. पौर्णिमा साखरे, ॲड. महेंद्र कोचर, समुपदेशक भरत काळे, ज्योती सपकाळे यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले.

ही राष्ट्रीय लोकअदालत कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश आय. जे. नंदा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. न्यायालयीन व्यवस्थापिका वंदना कोचर, प्रभारी प्रबंधक एस. आर. दाणी आणि कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी यांनी लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.